भारतात राहुन दहशतवादास खतपाणी घालणा-या विरूध्द आवाज उठवू:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव

कोपरगावांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचालनालयावर पुष्पवृष्टी…

कोपरगांव प्रतिनिधी:-
भारत देश एकसंघ असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकविसाव्या शतकातील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जाणिवपूर्वक पावले उचलुन राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या प्रति आदरयुक्त भावना ठेवून त्यांचे मनोबल उंचावण्यांसाठी साथ केली ही बाब हिंदुवासियांसाठी अभिमानाची आहे. मात्र भारतात राहुन दहशतवादास खतपाणी घालणां-या देशविघातक कृत्य करणा-या विरुद्ध आवाज उठवू असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
कोपरगांव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन झाले त्यावर पुष्पवृष्टी करतांना त्या बोलत होत्या. याप्रसंगी दीपा गिरमे, मंगल आढाव, भाजपा तालुकाध्यक्ष प्साहेबराव रोहोम, शहराधककदक्षाश्क्ष दत्ता काले, पराग संधान, विजय आढाव, स्वप्नील निखाडे, रवींद्र पाठक, विनोद राक्षे, आर डी सोनवणे, खालीक शेख, महिला जिल्हा उपाध्यक्ष किरण दगडे,, रवी रोहमारे, लकारे ,सर्व पदाधिकारी नगरसेवक आदी उपस्थित होते
सौ. कोल्हे पुढे म्हणाल्या की, देशसेवा हीच इश्वरसेवा आहे. भारतीय जनता पार्टीचा एक विचार आपण सर्व जण एक आहोत, सबका मलिक एक आहे. भारत देशातील प्रत्येक बालकाला देशाचा अभिमान आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे या प्रतिज्ञेने आपण सर्वजण शालेय शिक्षणात एकसंघ बांधले गेलेलो आहोत, हेच संस्कार सर्वांना द्यावे. डोळयात तेल घालुन सीमेवर रक्षण करणा-या भारतीय जवानामुळेच आपण सारे भारतीय बांधव सुरक्षीत आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सातत्याने संचालनालयातुन ही भावना जागृत ठेवण्याचे काम केले आहे. सर्व जाती धर्माचे लोक येथे गुण्या गोविंदाने नांदत आहेत, पण देशविघात कृत्य करणा-या विचारांना येथे थारा नाही असे त्या म्हणाल्या.

फोटोओळी:-कोपरगांव कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी संचलन केले भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी एकसंघ भारतासाठी पुष्पवृष्टी केली त्याप्रसंगीचे हे छायाचित्र छाया- जय जनार्दन फोटो, संजीवनी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *