मी अनुभवलेले साहेब रिझर्व बँकेवर मोर्चा:- मच्छिंद्र पा. लोणारी…

Uncategorized

माझे वडील काशिनाथदादा लोणारी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे विश्वासू सहकारी होते. शिंगणापूर परिसरासह कोपरगांव विधानसभा मतदार संघात विकासाची प्रक्रिया राबविण्यांत शंकरराव कोल्हे यांच्या खांद्याला खांदा देऊन आमचे वडील कार्यरत होते. मी लहान होतो.२३ डिसेंबर १९७८ रोजी शेतकऱ्यांच्या कर्जाला राष्ट्रीयकृत बँका जादा व्याजदर आकारतात म्हणून देशांत सर्वप्रथम माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी थेट रिझर्व्ह बँकेवर धडक मोर्चा थेट कोपरगावातून काढला होता.
मला कुतुहल होते, माझं वय लहान होतं पण शंकरराव कोल्हे साहेब यांची कार्य करण्याची शैली रुबाबदार होती त्यावर मी प्रभावित झालो आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई मोर्चात सहभागी होऊन साक्षीदार झालो. शेतकऱ्यांच्या किती हालअपेष्टा असतात याची जाण मला झाली. आज देशांत महेंद्रसिंग टिक्केत यांच्यासारखी मंडळी शेतकऱ्यांच्या समस्या संसदीय मंडळ दिल्लीपर्यंत धडकवतात अगदी तसचं नेतृत्व शंकरराव कोल्हे यांनी पार पाडलं अन राष्ट्रीयकृत बँकेच्या शेती कर्जात दीड टक्के एव्हढी भरघोस सवलत मिळाली हा ऐतिहासिक निर्णय होता, त्याचे मला अजुनही कुतूहल आहे. बिपीनदादा कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक नेमुन काम करण्याची संधी दिली केव्हढा विश्वास, त्यांच्या ऋणात राहून थांबतो.
मच्छिंद्र पा. लोणारी,
माजी संचालक, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना सहजानंदनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *