
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे आमच्या जाधव कुटूंबावर मोठे प्रेम होते. खरलं मोठं असल्याने गोतावळा खुप होता. साहेब कामानिमीत्त मुंबई नाशिकला असेल तर ते कानळद येथे आमच्या परिवाराकडे हक्कानी भेटायला यायचे. संजीवनी कारखान्यांत बिपीनदादा कोल्हे यांचे स्विच्य सहाय्यक म्हणून काम करत असतांना १९९९ मध्ये दुस-या जलसिंचन आयोगाचे अध्यक्ष माधवराव चितळे यांची संजीवनी कारखाना कार्यस्थळांवर भेट ठरली. उर्ध्व गोदावरी खो-यात कमी पडणा-या पाण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अहवाल शासनाने तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. दुस-या जलसिंचन आयोगासमोर माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांची साक्ष ठरली होती त्यासाठी अहमदनगर नाशिक विरूध्द मराठवाडा असा प्रादेशिक वाद न करता पश्चेिमेचे समुद्राला अतिरिक्त वाहून जाणार पाणी पुर्वेकडे सहज वळविता येईल याचा तौलनिक अभ्यास करून टिपण तयार केलं होतं ते संगणकावर टंकलेखन करण्याची जबाबदारी माझेवर होती. त्यांच्या समोर उभं राहुन ते सांगतील माहिती संगणकावर टाईप करून त्यांना सादर केली. कारखान्याच्या जनरल ऑफिस मध्ये त्यांच्याच कॅबिन शेजारी संगणक ठेवुन ८ दिवस रात्रंदिवस काम केलं. त्यांच्या मनमिळावू स्वभावाची सर्वप्रथम जाणीव त्यावेळी झाली. डॉ माधवराव चितळे यांच्यासमोर शंकरराजी कोल्हे साहेब यांनी टिपण सादर करून जोरदार साक्ष दिली, मनाचं समाधान झालं., नाशिक पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, सिंचन सल्लागार पुंडलिक मुरलीधर देव्हारे काका नाशिक यांची मोलाची मदत माजीमंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांना झाली.
अशोक रामनाथ जाधव, स्विय सहाय्यक,
