

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज माणूस तणावपूर्ण वातावरणात जगतो आहे माणसाचे समाधान हरवले आहे सुख शोधताना हातातले निसटून जाते आहे म्हणून सुखाने जगण्यासाठी आनंदी जीवनाचा मंत्र अंगिकारणे गरजेचे आहे,असे विचार डॉ सौ ज्योती राठी यांनी श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित समारंभात व्यक्त केले
श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी व ६७२ वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक दत्तात्रय एस पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळा आयोजीत करण्यात आला होता दत्तात्रय निकुंभ यांच्या हस्ते सपत्नीक पुजन करण्यात आले व्यापारी धर्मशाळेपासुन अहिंसा स्तंभ महात्मा गांधी चौक ग्रंथालय मार्गावरुन पालखी मिरवणूक काढण्यात आली
पुण्यतिथी निमित्त वेशभूषा स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सुनील खैरनार, ऋषिकेश खैरनार सौ भारती शिंपी सौ भावना गवांदे सौ निता नितीन डोंगरे सौ वैशाली पवार आदिंचया हस्ते प्रतिमा श्रीफळ गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले
एड विजय गवांदे व सौ भावना गवांदे उभयतांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली
पुण्यतिथी सोहळ्यासाठी भजनी मंडळांनी मोलाची साथ दिली कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्षा मिनल खांबेकर नारायण सारंगधर सौ मालती निकुंभ सौ निता डोंगरे सौ पृथ्वीदैवि बिरारी आदि मान्यवर उपस्थित होते सौ खैरनार व सौ भावना गवांदे यांनी सुत्रसंचलन केले दत्तात्रय पवार यांनी आभार मानले
