
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी,चांदेकसारे, कोकमठाण डाऊच खुर्द,डाऊच बुद्रुक, या भागात १०० टक्के शेतकऱ्यांनी खरिपाची पिके पावसाच्या भरवशावर घेतली आहे, पावसाने पाठ फिरवल्याने खरीपाचे
पीक अखेरची घटका मोजत आहे तर काही ठिकाणी पाण्याअभावी सुकून गेली आहे.
तेव्हा ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे व काही शेतकरी पिक विम्या पासून वंचित आहे तसेच कोपरगाव तालुक्यातील मागील वर्षाच्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली तर
नाहीच,नुकसान ग्रस्तांच्या यादीत आपली नावे आले आहे की नाही यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे यामुळे शेतकरी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय,तहसील कार्यालय या ठिकाणी खेटा मारत आहे तहसीलदार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्याचे आदेश काढावे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेला आहे पण त्यांचे यादीत नाव का नाही? अशी तलाठी कार्यालय यांना विचारणा करून काही सावळ्या गोंधळ असल्यास त्याची चौकशी व्हावी, शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये केली आहे पुढे ते म्हणाले की या वर्षी मशागतीचा खर्च सुद्धा वसूल होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला असले तरी काही शेतकरी अजून पीक पाणी नोंदवू शकत नाही संबंधित विभागाने शेतकऱ्यांची समक्ष पीक पाहणी करून ती नोंदवावी जेणेकरून नुकसान होऊ नये कोणताही शेतकरी अपात्र ठरणार नाही याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.तसेच कोपरगाव तालुक्यातील अजूनही काही मंडळांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांना त्वरित देण्यात यावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी केली.
