गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश नोंदणीसाठी याहीवर्षी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचा याहीवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी २०१३ साली गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सुरू केले. या ठिकाणी असलेले निसर्गरम्य वातावरण मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा त्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आला आहे.शैक्षणिक वर्ष २०२३/२४ च्या पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ०१ जुन २०२३ पासून नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्याची अभिनव पद्धत, बस सेवा, अद्यावत लॅबोरेटरीज, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रशस्त खेळाचे मैदान अशा अनेक सुविधा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावत असून उत्तीर्ण होणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटच्या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यांमध्ये होणाऱ्या नियुक्त्या त्यामुळे गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट शाश्वत नोकऱ्या देणारे शैक्षणिक संकुल झाले आहे.
संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्र अपलोड करणे, सर्व विद्यार्थ्यांची माहिती त्यांचे मागील वर्षाचे कट ऑफ प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती बाबत माहिती तसेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक ब्रँच नुसार भविष्यात असणाऱ्या उपलब्ध संधी याबाबत विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सखोल मार्गदर्शन केले जात आहे.
विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली असून पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेऊन अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ घेऊन लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा अशी आव्हान प्राचार्य सुभाष भारती यांनी केले आहे.
चौकट :- गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. माफक फी व दर्जेदार सेवा यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढतच चालला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अभियंता स्वप्न साकार होत असल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यकाळात विद्यार्थ्यांची संख्या यापेक्षाही अधिक होणार असल्यामुळे मागील वर्षापासून सुरु केलेल्या नव्या इमारतीचे काम पूर्ण होत असून यावर्षी प्रवेश घेणारे सर्व विद्यार्थी नव्या इमारतीतच आपले शिक्षण पूर्ण करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *