
कोपरगाव प्रतिनिधी:-
आहो माननीय .नगराध्यक्ष विजयराव वहाडने साहेब, मी कधीही तुमच्या वर राजकीय हेतूंनी टीका केली नाही , जनतेला होणारात्रास न बघून व विनंती करून ही कामे होत नाही म्हणून शेवटी बोलवयास तुमीच भाग पाडले……
माजी.नगराध्यक्ष. मंगेश पाटील………..
काल तुम्ही माझ्यावर खोचक शब्दात टीका केले की माझ्या नगराध्यक्ष पदाच्या काळात नगराध्यक्ष पदाच्या खुर्ची ची ऊब मी घेतली व मी का नाही शहर धूळ मुक्त केले अशी आपण माझ्यावर टीका केली , हे बोलणे आपल्या सारख्या व्यक्तीला शोभत नाही , हे राजकीय उत्तर झाले , मी नेहमी शहराच्या हिताच्या , तरुण पिढीच्या भवितव्याचा फक्त विचार करून व कोपरगाव ची काय केले तर बाजार पेठ वाढेल , व्यापार वाढेल , रोजगार वाढेल की ज्या मुळे सर्वां कडे मुबलक पैसे असतील , होतील , येतील या सामाजिक हिताचे बोलतो, त्यात राजकीय टीका टिपणीत मला अजिबात रस नाही .तुम्हाला स्वतःला च राजकारणात इंटरेस्ट आहे , शहराचे हिताचे काम करायचे सोडून देऊन आपण आमदार किला उभे राहिले ,यात स्पस्ट दिसते, की खुर्चीच्या ऊबेची कोणाला चटक लागली…मला नगराध्यक्ष पदाचा काळ फक्त ४.५( साडेचार ) महिण्याचा मिळाला होता , त्यात दीड महिना लोकसभेची लगेच आचारसंहिता लागली .तरी एकून कमी काळात निश्चित जनहीताचे , जनतेच्या फक्त मनात असलेले कामे तुमच्या पेक्ष्या कमी खूपच कमी काळ मिळून ही जास्त आणि उच्च प्रतीची आणि गावाच्या हिताची केली.सर्वात कमी कार्यकाळ मिळालेला मी आज परियन्त चा नगराध्यक्ष आहे.आहो तुमच्या सारखे मला ४.५ / साडेचार वर्ष जर मिळाली असती तर कोपरगाव शहराचा कायापालट करूनच दाखवलाच असता. त्यात नगराध्यक्ष होण्याआधी मी नगरसेवक झालो त्यांतर सत्ताधारी पक्षाचा गट नेता होतो , मी बांधकाम सभापती होतो व स्थाई समितीचा सदस्य होतो ,आरोग्य व पाणी पुरवठा समितीचाही सदस्य होतो ,त्या मूळे नगरपालिकेच्या सर्वे समित्यांच्या कदाचित आपल्या पेक्ष्या सर्वे माहिती ,जाणीव व अधिकार मला थोडे जास्त माहीत आहेत आणि खरी खुर्ची ची ऊब ४.५ ( साडेचार वर्षात ) तुमि उपभोगली आहे ,म्हणूतर शहराचे काम करायचे सोडून तुम्हाला आमदारकी चे डोहाळे लागले आणि तुमि उभे राहिले…तुमि जर शहरात रोज स्वच्छ पाणी , धूळ रहित गाव , सर्वे मेन रोड उच्च प्रतीचे डांबरी करण , निदान एव्हडे जरी शहरात चांगले काम केले असते तर निश्चित तुमि आराम शीर आमदार ही झाले असते .डिपॉझीत जप्त होण्याची वेळ आली नसती..तुमि महाराष्ट्र। मध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून आलेत, ते ही १ रुपयाही न वाटता , उलट छोट्या भाजीपाला विकरी करणाऱ्या बाई पासून , तर रोजानी हमाली करणाऱ्या, तसेच विस्थापित टपरी धारक , व्यापारी ,जनतेनी मोठ्या आशेने, ते सर्वे थरातील जनतेनी तुम्हाला स्वतःहुन पैसे , वर्गणी दिली इलेकशन साठी दिले , की खरोखरच तुमि भ्रष्टाचार थांबावाल आणि कोपरगाव शहराचा कायापालट करून दाखवालं व या मोठ्या आशेने जनतेने भरभरून मते दिली होती .पण तुम्ही जे बदल कराल ते वाटले होते ते करू नाही शकले..आणि सर्वात महत्वाचे मी बिन बुडाचे आरोप करत नाही , मी स्वतः हा सिव्हिल इंजिनीयर आहे ,त्यातील काय केले तर चांगले काम होऊ शकेल हे मला कळते आणि २५ वर्षांपासून बांधकामाचे काम करतो ,त्या मुळे माझ्या फक्त ४.५ ( साडेचार ) महिण्याचा काळात मी चांगले काम करू शकलो व काय केले पाहिजे म्हणजे चांगल्या प्रतीचे काम करत येईल आणि शहर सुधारेल चांगले ,करता येईल हे मी जाणून आहे आणि म्हणून न राहून बोलावे लागते….मी सर्वात महत्वाचे म्हणजे मी बांधकाम कॉन्ट्रॅक्टर असून आज परियन्त १ नया पैश्याचे काम ,आज परियन्त नगरपालिकेत घेतले नाही/ केले नाही किंवा दुसरीच्या नावावर ही केले नाही ,किंवा माझ्या कुटुंबातील मुलगा , भाऊ इतर कोणी केले नाही आणि कामात हिड्डन पार्टनर झालो नाही .
कारण मला नगरपालिकेत कामे घेण्यासाठी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष मी झालो नव्हतो , शहराचा विकास करावा हीच फक्त ईच्छा आहे , तरुण पिढी साठी , माताभगिनीं ची जी हाल २१ दिवसांनी पाणी मिळायला लागले म्हणून पाण्या साठी होणारी हाल बघून न राहून म्हणून पाणी आंदोलन जनतेला बरोबर घुंन केले , आत्ताही शहरातील धूळ आणि मेन रोड ची आणि त्यावरील खड्डे बघून व वेडेवाकडे स्पीड ब्रेकर बघून ,अखेर बोलावे लागेल ..तुम्हाला आम्ह।ला बोलायचं मतदार , नागरिक या नात्याने मागणी करायचा विनंती करायचा अधिकार आहे ,कारण तुमि नगराध्यक्ष आहात , तुमच्या पदाला मी बोललो , वयक्तिक तुम्हाला नाही , तुमच्या जागी दुसरे कोणीही त्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदावर असते तर काम नाही केले , झाले तरी म्हणून बोललो असतो …तुमि माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला व त्यावर वयक्तिक माझ्यावर टीका केली , म्हणून हे उत्तर खुलासा तुम्हाला नाईलाजाने मला दयावा लागला . आणि सर्वात महत्वाचे की मा. आमदार आशुतोष दादा काळे साहेब हे खूप तरुण आहेत ,पण त्यांच्यातील मॅच्युरिटी ही मोठ्यांना लाजवेल अशी आहे त्यांनी तुमि त्यांच्या विरोधात आमदार किला उभे राहिले तरी आणि त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पाडला तरी सर्वे विसरून तातकाळ तुम्हाला शहर विकासात जाहीर पाठिंबा लगेच दिला आणि आजही तो कायम आहे ,तसेच कोरोना च्या काळात नागरपालिके ला खूप मदत ही केली आणि त्यांनी निधी आणण्यासाठी आमदार या नात्याने मदत करतच आहे.सर्वे काळे पार्टीचे नगरसेवक व मा. श्री.राजेन्द्र भाऊ झावरे यांना मानणारे नगरसेवक ही ठराव मंजूर चांगल्या कामासाठी करण्यासाठी ही सहकार्य करत आहे , हे आपण विसरू नये , बाकी काम करणे हे आपल्या हातात आहे. आहो खूप अधिकार आहेत आपल्याला त्याचा उपयोग जर करता आला तर कोपरगाव , नगरजिल्हात एक नंबर चे गाव खरे कॅलिफोर्निया होऊ शकते आणि ते सोपे आहे ,फक्त त्या साठी ताठर भूमिका आणि मी पण सोडून मान ,अपमान आणि थोडे जनतेसाठी आणि गावाच्या साठी एक पाऊल मागे घुंन , समोरच्या ला मोठे पना दिला तर आपण काय लहान होत नाही ,उलट शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करता येतो..तेव्हा आजून न ही वेळ गेलेली नाही निदान नवीन तळे होई परियन्त ४ दिवासाआड सध्या साठी पाणी पुरवठा करावा , धूळ कमी करण्यसाठी तातडीने काम चालू करावे , सर्वे मेन रोड चांगल्या प्रतीचे डांबरीकरणं करावे , निदान एव्हडे केले तरी तुमचे खूप ऋणी राहू…आजून खूप काही गावांसाठी करण्या सारखे आहे , निदान येव्हडे तरी करा .तसेच माजी.नगरसेवक बबलू शेठ वाणी हे जरी दुसऱ्या पक्षाचे असले तरी त्याचे पाणी आणि आरोग्य चे काम खूप चांगले होते ,त्याचेही मार्ग दर्शन घेतले तर निश्चित जनतेला उपयोगी होईल……
ही विनंती.
