त्या २८ कामांना भ्रष्टाचाराचा वास या सुनील गंगुलेंच्या वक्तव्याचा त्यांनाच विसर पडला, जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवली म्हणूनच उर्वरित पैशात अन्य विकास कामे मार्गी लागली:- अविनाश पाठक…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर विकासाअंतर्गत त्या २८ कामांना भ्रष्टाचाराचा वास आहे असे जाहीर वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले यांनीच केले होते, आता त्यांनाच या वक्तव्याचा विसर पडला असुन त्या आडून भलतीकडेच शहरवासियांचे लक्ष विचलीत करण्याची दुतोंडी पद्धत घातक असून जनतेच्या पैशांची उधळपट्टी होवू नये म्हणूनच या कामात वाचलेल्या दोन ते अडीच कोटी रूपयामधुन अन्य विकास कामे मार्गी लागल्याचे पत्रक कोपरगाव भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, २८ कामांना विरोध नव्हता तर कोल्हे गटाचा फक्त वाढीव अंदाजपत्रके असणाऱ्या ६ कामांमध्ये सुधारणा करण्याचा आग्रह होता. उर्वरित २२ कामांची काहीही अडचण नव्हती, याची विरोधकांना जाणीव आहे मात्र जनतेसमोर विरोधक खोटे पडल्याने गीरे तो भी टांग उपर अशी गत त्यांची झालेली आहे.
शहरातील जनतेला निळवंडे धरणातून पाईप लाईनने शुद्ध व स्वच्छ पाणी मिळण्यासाठी तत्कालिन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे पाईप लाईन योजना मंजूर करुन आणली, जर त्या वेळी काही लोकांना न्यायालयात पाठवून या योजनेला अडथळा नसता आणला तर आता शहरातील जनतेला निळवंडेचे पाणी आजपर्यंत मिळाले असते, त्यामुळे तेव्हा केलेलं पाप आता धुण्याची संधी मिळाली आहे.
विद्यमान आमदार हे आता साईबाबा संस्थान शिर्डीचे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी ही योजना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, पाच नंबर तळेही झाले पाहिजे व निळवंडेचे पाणीही आले पाहिजे ही आमची व शहरातील जनतेचीही भूमिका आहे, तसं तुम्ही व आमदार ठामपणे असं का सांगत नाही की ५ नंबर तळे व निळवंडेचे असे दोन्ही कडील पाणी आलं पाहिजे, असे केव्हा बोलणार ?
कोपरगाव शहर विकास अंतर्गत त्या २८ कामाबाबतीत आम्ही न्यायालयात दाद मागितली म्हणून शहरातील जनतेचे दोन ते अडीच कोटी रुपये वाचले. या वाचलेल्या पैशातुन शहरातील इतर भागात कामे झाली. आज सवंग लोकप्रियतेच्या नावाखाली आमच्यावर आरोपकर्त्यनी व आमदारांनी शहरातील जनतेला जाऊन विचारावे म्हणजे त्यांना समजेल कि कोपरगाव शहरवासीयांना ५ नंबर तळ्याबरोबरच निळवंडेचेही पाणी पाहिजे. मात्र आमचेवर आरोपकर्त्याणा जनतेचा हा आवाज ऐकायला येणार नाही, कारण सत्तेच्या मुजोर फटाक्यांनी त्यांचें कान बधिर झाले आहेत.
विरोधकांना कोपरगाव शहरातील जनतेची व बाजारपेठेची काळजी असती तर त्यांनी निळवंडे पाईपलाईन योजनेला विरोधच केला नसता. शहरात आलं की पाणी या विषयावर वेगळी भूमिका मांडायची आणि निळवंडे कार्यक्षेत्रात गेल्यावर निळवंडेचे पाणी मी कोपरगाव शहरासाठी जावू देणार नाही अशी सोयीस्कर दुटप्पी भूमिका लोकप्रतिनिधी व त्यांचे बगलबच्चे मांडत आहेत हे शहरातील सुज्ञ जनतेच्या लक्षात आले आहे, या सर्वांना साईबाबा लवकरच सुबुद्धी देवो असेही अविनाश पाठक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *