कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी अनेक शेतकरी हिताचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महा-डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून महाविकास आघाडी शासनाने एक अर्ज अनेक योजना हि मोहीम शेतकऱ्यांसाठी राबविली जात आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एका अर्जावर अनेक घटकांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाने प्रोत्साहित करून कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन २०२१-२२ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आले तसेच हरभरा बियाणे, जैविक संच यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, चालू वर्षीचा खरीप हंगाम अडचणीचा होता. अतिवृष्टीमुळे खरीपाचे काहीसे नुकसान झाले आहे. परंतु झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे गरजेचे आहे. पाऊस समाधानकारक झाला असल्यामुळे बियाणे व खतांची देखील मागणी वाढणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बियाणांची व खतांची टंचाई जाणवणार नाही याची काळजी घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे अशा सूचना आ.आशुतोष काळे कृषी विभागाला दिल्या. दिवाळीनिमित्त तहसील कार्यालय व परिसरात लावण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन बचत गटाच्या दुकांनाना आमदार आशुतोष काळे यांनी भेट दिली.

       यावेळी पंचायत समिती सभापती सौ.पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, अनिल कदम, रोहिदास होन, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, सुनील बोरा, प्रशांत वाबळे, विठ्ठल जावळे, प्रशांत घुले, आकाश डागा, अनंत रक्ताटे, गणेश घाटे, प्रकाश दुशिंग, सलीम पठाण आदींसह शेतकरी, बचत गटांच्या महिला आदी उपस्थित होते.

     चौकट :- महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम व योजना मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना  येणाऱ्या अडचणी आ. आशुतोष काळे यांच्या माध्यमातून तातडीने सोडविल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी कमी कशा होतील यासाठी कृषी विभाग सतत प्रयत्नशील असून शेतकऱ्यांना घर बसल्या महाडीबीटी फार्मर ॲपच्या माध्यमातून शेतकरी अर्ज करू शकतात. या उपक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात निधी कोपरगाव मतदार संघाला मिळाला आहे. अशा योजनेत जास्तीत जास्त  शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्यास  खऱ्या अर्थाने शाश्वत रब्‍बी हंगामात उत्पादन वाढीसाठी हातभार लागेल व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साध्य करता येईल - मनोज सोनवणे प्र. तालुका कृषी अधिकारी  

फोटो ओळ – कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन २०२१-२२ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित अवजारे वाटप करतांना आ. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *