
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील सुज्ञ नागरिकांनी बदल घडवला. दोनच वर्षात प्रतिकूल परिस्थितीत मतदार संघाच्या विकास कामांना चालना मिळाली. त्यामुळे असाच बदल कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील करून कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिकेत सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
कोपरगाव शहरातील साईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन शाखेचे उद्घाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेली इनकमिंग यावेळी देखील दिसून आली. पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोपरगाव शहराच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता नसतांना देखील संघर्ष केला आहे. व सत्ता मिळताच प्रश्न देखील मार्गी लावले आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पाच नंबर साठवण तलावाचा प्रश्न निवडून येताच दोनच महिन्यात मार्गी लावला असून इतरही विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी कोपरगाव शहरासाठी आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव शहराच्या विकासाचे व्हिजन प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात पोहोचवावे. नागरिकांना विकास हवा आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी विकासाच्या बाजूने असल्यामुळे नागरिकांचा आपल्यावर असलेला विश्वास अधिकच वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता मिळवून द्यायचीच हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी अंग झोकून कामाला लागावे यश निश्चित मिळणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना उभारी दिली आहे. यावेळी आकाश आंग्रे, आकाश जगताप, प्रदीप थोरात, निरंजन कुडेकर, मुनेश गुप्ता, कृष्णा कडलग आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे आ. आशुतोष काळे यांनी स्वागत केले.
यावेळी महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख, हाजीमेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राहुल रोहमारे, साईनगर शाखेचे अध्यक्ष अभिषेक कोकाटे, अध्यक्ष विवेक वाघ, उपाध्यक्ष श्रेयश आढाव, सचिव आदेश काले, संघटक सत्यम जगदाळे, खजिनदार अथर्व वढणे, माजी नगरसेवक रमेश गवळी, फकीरमामु कुरेशी, कृष्णा आढाव, दिनकर खरे, सुनील बोरा, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, राजेंद्र जोशी, रोहित खडांगळे, वाल्मीक लहिरे, राजेंद्र खैरनार, जावेद शेख, राहुल देवळालीकर, धनंजय कहार, अशोक आव्हाटे, संदीप देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, मनोज कडू, इम्तियाज अत्तार, राजेंद्र आभाळे, गणेश लकारे, ऋषीकेश खैरनार, साहेबराव खालकर, सागर लकारे, निलेश डांगे, बापू वढणे, एकनाथ गंगूले, रमेश टोरपे, शुभम लासुरे, विकास बेंद्रे, प्रसाद उदावंत, मुकुंद इंगळे, राकेश शहा, रोहित खंडागळे, योगेश नरोडे, भाऊसाहेब भाबड, मनोज नरोडे, रोशन शेजवळ, महेश उदावंत, विशाल गुंजाळ, अमोल आढाव, कैलास मंजुळ, लक्ष्मण सताळे, पुंडलिक वायखिंडे, दिनेश संत, अझर शेख, फिरोज पठाण, शिवाजी कुऱ्हाडे, नितीन शिंदे, ओंकार वढणे, अमोल देवकर, राहुल रीळ, आप्पासाहेब आव्हाड, विनय आव्हाड, अमोल गिरमे, रितेश राऊत, शफीक शेख, राहुल राठोड, प्रताप गोसावी, गीरमकर सर, दळवी सर, कोकाटे सर, इंगळे सर, पाचोरे सर आदी उपस्थित होते.

फोटो ओळ:- कोपरगाव शहरातील साईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखा उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आ. आशुतोष काळे.
