आ.आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित्तविविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांचा सोमवार (दि.०४) रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त कोपरगाव मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आ.आशुतोष काळे महात्मा गांधी जिल्हा चॅरीटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल कोपरगाव येथे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. […]

Read More

पंजाबी समाजाचे आधारस्तंभ व पूर्ण समाजाने ज्यांना गुरु मानले,असे स्व.ऐ.जी लोंगाणी (सी.ए) यांचे दुःखद निधन ,भावपूर्ण श्रद्धांजली:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-पंजाबी समाजाचे आधारस्तंभ व पूर्ण समाजाने ज्यांना गुरु मानले,असे स्व.ऐ.जी लोंगाणी (सी.ए) यांचे दुःखद निधन झाले.भावपूर्ण श्रद्धांजलीकोपरगावातील पहिले “चार्टर्ड अकाउंटंट” म्हणून त्यांना कोपरगाव उद्योग जगात मानाचे स्थान होते. अकाउंटिंग,टॅक्सेशन आणि ऑडिट या क्षेत्रात त्यांनी नेत्र दीपक प्रगती केली. लहान व्यापाऱ्यांपासून मोठ्या उद्योगपती पर्यंत शिर्डी येथील हॉटेल व्यवसायिक यांना ते टॅक्सेशन बाबत मोलाचा सल्ला देत.आज […]

Read More

कृषि यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने बदलत्या हवामानावर मात करणे शक्य:-सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शेतीमध्ये आव्हाने खूप आहेत. आजच्या काळात दिवसेंदिवस बदलत चाललेल्या हवामानाला तोंड देणे अवघड होत चालले आहे. परंतु शेतकरी बांधवांनी न डगमगता या आव्हानांचे रुपांतर संधीमध्ये करावे. कृषि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून जागतिक हवामान बदलावर आपण मात करू शकतो असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड यांनी केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी […]

Read More

के.जे.सोमैया वरिष्ठ व के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या विद्यमाने “तुमचे हक्क जाणून घ्या : लैंगिक छळाविरुद्ध कायदेशीर संरक्षण” या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानसत्र…

कोपरगाव प्रतिनिधी:-“भारताचे संविधान सर्वोच्च आहे. संविधानामुळे विविध कायदे पारित केले जातात. कायदा आणि नियम यामध्ये फरक आहे. रूढी-परंपरांमधूनच कायद्याचा उगम झाला आहे. समाजाने गुण्यागोविंदाने जगावे यासाठी कायदे करण्यात आले आहेत”,असे प्रतिपादन ॲड .मेधा लोढा यांनी केले.स्थानिक के जे सोमैया वरिष्ठ व के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या विद्यमाने “तुमचे हक्क जाणून […]

Read More

बालनाट्य स्पर्धेत आत्मा मालिकची नेत्रदीपक कामगिरी…

कोपरगाव प्रतिनिधी:- हायजिन फर्स्ट या संस्थेच्या वतीने आयोजित ‘अन्नसुरक्षा जनजागृती’ या आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा २०२५-२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला. या बालनाट्य स्पर्धेत आत्मा मालिकने नेत्रदिपक कामगिरी केली असून तीन पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.स्वच्छ परिसर, स्वच्छ किचन व वैयक्तिक स्वच्छता या गटांमध्ये आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाने ‘प्रथम’ क्रमांक पटकाविला, तसेच बालनाट्य स्पर्धा ही […]

Read More

शुक्राचार्य देवस्थान ८०लाखांच्या विकासकामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- जगातील एकमेव मंदिर म्हणून ओळख असलेल्या कोपरगाव बेट भागातील गुरु शुक्राचार्य मंदीर व परिसराच्या विकासासाठी निधी मिळावा. यासाठी केलेल्या प्रयत्नातून ८० लाख रुपयांच्या विकास कामांच्या निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्या असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.जगात एकमेव असलेल्या कोपरगाव शहराच्या बेट भागातील गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये सद्गुरु शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती […]

Read More

प्रशासन आणि जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण होण्यासाठी पारदर्शक आणि तत्पर सेवा अत्यंत आवश्यक:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जनता करातून शासनाची तिजोरी भरते. या कराच्या माध्यमातूनच प्रशासकीय यंत्रणेचा खर्च भागवला जातो. त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने ही जाणीव ठेवून जनतेची सेवा करण्याची जबाबदारी पार पाडावी. प्रशासन आणि जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण होण्यासाठी पारदर्शक आणि तत्पर सेवा अत्यंत आवश्यक आहे असे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.राज्य शासनाच्या सूचनेनुसार […]

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेसमाजासाठी लढणारे योद्धा:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम होते. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे आणि काव्याच्या माध्यमातून वंचित, शोषित, आणि उपेक्षित घटकांच्या व्यथा जगासमोर मांडल्या. अण्णाभाऊ साठे हे फक्त साहित्यिक नव्हते, तर ते समाजासाठी लढणारे योद्धा होते असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे […]

Read More

शिंगवेच्या कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांचा काळे गटात प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करतांना आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील राहाता तालुक्यातील अकरा गावांचा देखील विकास साधला आहे. मतदार संघाचा विकास हि निरंतर चालणारी प्रक्रिया असून विकासाची एक काम पूर्ण होत नाही तोपर्यंत विकासाचे दुसरे काम पुढे येते. त्यामुळे मतदार संघाच्या विकासाची सुरु असलेली वाटचाल यापुढे देखील अविरतपणे सुरु राहणार […]

Read More

राज्यात १ ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह साजरा होणार ; महसूल सेवेचे सक्षमीकरण, जनजागृती व लोकाभिमुख उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी…

कोपरगाव प्रतिनिधी:– शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभरात ‘महसूल सप्ताह – २०२५’ चे दि.१ ऑगस्ट ते दि.७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या योजनांची माहिती, लाभ व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी शासनाने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली. सप्ताहाची सुरुवात दि. १ ऑगस्ट रोजी ‘महसूल […]

Read More