
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील रहिवासी ईंद्रराज उर्फ बंडोपंत पोपटराव चिंचपुरे (वय ६५) यांचे निधन झाले आहे.
शेती व्यवसाय,पिठ गिरणीचे संचालक होते.त्यांनी सन २०१३ या वर्षात गोदावरी स्वच्छता अभियानात अहोरात्र निस्वार्थ योगदान दिले आहे.वृक्षारोपण आणि संवर्धन हा त्यांचा आवडीचा विषय होता. गरिबी आणि कष्टाची जाण असल्याने जनसामान्यांच्या मदतीला नेहमी धावून जात असे.सूर्यतेज संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत. कोरोना संकटात गरजूंना मदत कार्यात नेहमी सहभागी झाले होते.
त्यांचे पच्छात पत्नी,बंधू,कौस्तुब, अनिकेत ही दोन मुले यासह नातेवाईक व मोठा मित्रपरिवार राहिला आहे.नाना या नावाने ते परिचित राहिले आहे.
