
कोपरगाव प्रतिनिधी:- महान समाजसुधारक जोतिराव फुले यांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहादुर विठ्ठल कृष्णाजी वंडेकर यांच्या हस्ते मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे तमाम जनतेच्या वतीने ११ मे १८८८ रोजी ‘महात्मा’ या पदवीने गौरविण्यात आले. तेव्हापासून जोतीराव फुले हे महात्मा फुले नावाने परिचित झाले. म्हणून ११ मे हा दिवस ‘महात्मा दिन’ म्हणून देशभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करावा असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांनी केले आहे.
महात्मा फुले यांचे कार्य संपूर्ण जगाला सर्वश्रुत आहे. स्त्री-शुद्र-अतीशुद्र समाजाच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले व ज्योतीबा फुले ज्या तन्मयतेने झटत होते, त्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले होते त्या आपल्या उद्धारकर्त्या महामानवाचे ऋण फेडण्यासाठी गरीब व कष्टकरी जनतेने मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे जमून जोतीबा फुलेंना युगप्रवर्तक कार्याबद्दल महात्मा पदवीने गौरविले होते त्या घटनेस ११ मे २०२३ रोजी १३५ वर्षे पुर्ण होत आहेत. या घटनेचा वेध घेऊन श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेने देशभर सलग ८ वर्ष विविध उपक्रम घेऊन हा विशेष दिन साजरा केला असून यावर्षी देखील ‘महात्मा दिन’ उत्साहात साजरा करावा असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ गुलदगड,संजीवनी पतसंस्था चेअरमन प्रदीपजी नवले साहेब
अशोक माळवदे (कोपरगाव तालुकाध्यक्ष )
संतोष रांधव (उपाध्यक्ष)
डाॅ.मनोज भुजबळ (कार्यअध्यक्ष)
योगेश ससाणे (सचिव)
संदीप डोखे (संपर्क प्रमुख)
अनंत वाकचौरे (खजिनदार)
शेखर बोरावके (कोपरगाव शहरध्यक्ष)
मनोज चोपडे (शहर उपाध्यक्ष) ओकांर वढणे (शहर कार्यअध्यक्ष)
करण्यात आले आहे.
