कोपरगाव प्रतिनिधी:- खासगी असो वा शासकीय क्षेत्रात नोकरी करताना कागदोपत्री नियमानुसार व वयानुसार आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन सेवानिवृत्त व्हावे लागते. परंतु, हि सेवा निवृत्ती फक्त कागदोपत्रीअसून यानंतर खऱ्या अर्थाने आयुष्याचा दुसरा सामना सुरु होतो. ज्यामध्ये आपण आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवार यांना वेळदेऊ शकतो. त्यामुळे नोकरी करताना होणारी सेवानिवृत्ती हि फक्त कागदोपत्री असून त्यानंतरच खऱ्याअर्थाने नव्या आयुष्याची सुरुवात होते. असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हंटले आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी श्री. रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक छबुराव पाळंदे हे ३४ वर्षाच्या प्रदीर्घसेवेनंतर येत्या ३१ मेला सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने विद्यालयात नुकताच त्यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष एम.के. टेके होते.
यावेळी प्रमुखपाहुणे म्हणून महांनंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, आमदार सत्यजित तांबे, रयत शिक्षण संस्थेचे उपविभागीय अधिकारी काकासाहेब वाळुंजकर, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, गोदावरी बायोरीफायानरिजचे संचालक सुहास गोडगे, कोपरगाव बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके, सुरेश जाधव, माजी सरपंच सतीश कानडे, बद्रीनाथ जाधव, कामगार अधिकारी संजय कराळे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे, सुरेश बोळीज, विलास वाकचौरे, सर्जेराव मते, रमेश शिंदे, रामदास सोनवणे, भाऊसाहेब टेके, अशोक बोर्डे, अँड. शरद जोशी यांच्यासह मुख्याध्यापक छबुराव पाळंदे, सुनीता पाळंदे, अमोल पाळंदे, सोनाली बागुल, कविता खरात व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक छबुराव पाळंदे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक पाळंदे यांनी विद्यालयातील गरीब विद्यार्थी फंडासाठी १५ हजारांची आर्थिक मदत देऊ केली. यावेळी आपल्या ३४ वर्षाच्या शैक्षणिक कार्याचा मागोवा घेताना मुख्याध्यापक पाळंदे हे अत्यंत भावूक झाले होते. याप्रसंगी सुरेश बोळीज, रमेश शिंदे, काकासाहेब वाळूजकर, शबाना शेख, कैलास शेळके व सदिक्षा वाघ या विधार्थीनीने मनोगत व्यक्त केले. तसेच एम. के. टेके यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
यावेळी कोपरगाव तालुक्यातील विविध शाळांचे आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण प्रेमी ग्रामस्थ तसेच दापूर येथील उच्चपदस्थ माजी विद्यार्थी, कौटुंबिक सदस्य, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वसंत जाधव यांनी तर आभार नारायण सुकटे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यश्वितेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विधार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.


फोटोओळी:-
वारी येथील सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार सत्यजित तांबे, यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.
