
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात आज दिनांक २९ जुलै रोजी शासनाच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभा घेण्यात आली ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात बोलावलेल्या या ग्रामसभेचे अध्यक्षपदी सरपंच सुवर्णा पवार होत्या. अध्यक्षपदाची सूचना ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड यांनी दिली तर त्यास अनुमोदन ग्रामपंचायत सदस्य यशवंत आव्हाड यांनी दिले.
या ग्रामसभेमध्ये हर घर तिरंगा अभियान राबवण्याबाबत ,कोविड
लसीकरणाचे नियोजन, जल जीवन मिशन अभियान राबवणे या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली तसेच ग्रामस्थांचे पाणी प्रश्न रस्ता शाळेची दुरुस्ती या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्या यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी ग्राम सहभाग घेण्यात यावी असे आग्रह धरला. या ग्रामसभेस २०० नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी संचालक बाळासाहेब वक्ते, आरपीआय प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड, संचालक सतीश आव्हाड, सरपंच सुवर्ण पवार, उपसरपंच ताराचंद लकारे, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, पोलिस पाटील बाळासाहेब गायकवाड, शिवाजी यादव वक्ते,रमेश वक्ते ,आनंदा चव्हाण,आप्पासाहेब वक्ते, बापूराव वक्ते ,कल्याण गुरसळ,किरण पाटीलबा वक्ते, महेंद्र वक्ते, संजय वक्ते, रामभाऊ आव्हाड, नाना मोहीते, नानासाहेब गुरसळ, सतीश पवार,
ग्रामपंचायत सदस्य गंगुबाई जाधव, ग्रामविकास अधिकारी केबी रणछोड, क्लार्क आनंद बारसे, राणा वक्ते, रोहीत जावळे, शिक्षक नवनाथ सूर्यवंशी अनुज दुमणे, साळवे सर, अंगणवाडी सेविका मदनीस अशा सेविका तसेच ग्रामपंचायत कार्यालय यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व उपस्थितांचे अभार माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण
यांनी मानले.
