
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- मागील पाच वर्षात विकासाच्या बाबतीत वंचित असलेल्या नैऋत्य भागाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. या भागातील बहुतांश नागरिक वाड्या वस्त्यांवर राहत असून प्रत्येक नागरिकांना अपेक्षा आहे की, आपल्या घरापर्यंत चांगला रस्ता असावा. त्यादृष्टीने या भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याबरोबरच पाणी, आरोग्य, वीज आदी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण नुकतेच ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मतदार संघाला विकासाच्या वाटेवर घेवून जात असतांना रस्ते, वीज, पाणी या बरोबरच अद्यावत सर्व सुविधांनीयुक्त प्रशासकीय इमारती नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणे देखील तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालय ते शहरातील सर्व प्रशासकीय इमारतींना निधी दिला आहे. मतदार संघातील विकासाचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला त्यामुळे मतदार संघामध्ये विकासाच्या बाबतीत मोठा बदल झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, माजी पं.स. उपसभापती अर्जुनराव काळे, राहुल रोहमारे, रोहिदास होन, एम.टी. रोहमारे, सरपंच बाबुराव थोरात, के.डी. खालकर, युवराज गांगवे, श्रीहरी थोरात, दत्तात्रय गांगवे, देवेन रोहमारे, नंदकिशोर औताडे, किसनराव पाडेकर, केशव जावळे, प्रभाकर गुंजाळ, योगेश औताडे, कौसर सय्यद, बाबासाहेब गुंजाळ, चंद्रकांत पोकळे, शिवाजी थोरात, दिलीप जुंधारे, योगेश खालकर, साहेबराव कांडेकर, रामनाथ कांडेकर, अमोल पाडेकर, लक्ष्मण थोरात, सुधाकर थोरात, किसन पोकळे, शिवाजी भोसले, कैलास गव्हाणे, बळीराम गव्हाणे, गोरक्षनाथ थोरात, गणेश थोरात, रमेश गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, जिजाबापू गव्हाणे, अशोक सरवार, विनोद जवरे, प्रमोद गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, बाबासाहेब गव्हाणे, आण्णा चौधरी, नानासाहेब शेंडगे, नरहरी रोहमारे, सुनील वर्पे, रविंद्र वर्पे, अमोल थोरात, कचेश्वर रहाणे, गोपीनाथ रहाणे, योगेश थोरात, त्र्यंबक थोरात, अशोक डांगे, नारायण पन्हाळे, रावसाहेब रहाणे, दगु थोरात, कचरू कांडेकर, बाळासाहेब रहाणे, सिकंदर इनामदार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट :- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदार संघाचा विकासाच्या बाबतीत झालेला बदल मतदार संघातील नागरिक अनुभवत आहे. नैऋत्य भागाच्या नागरिकांना मागील अनेक वर्षापासून राज्यमार्ग ६५ च्या झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे मोठा त्रास सहन करावा लागला आहे. त्याची गंभीरपणे दखल घेवून कोपरगाव संगमनेर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावतांना १० कोटी निधीतून झगडे फाटा ते कोपरगाव तालुका हद्द (भागवत वाडी) या रस्त्याच्या कामास लवकरच प्रारंभ होणार असून एकाचवेळी अखंडपणे हा रस्ता होणार आहे.- ना. आशुतोष काळे.
