कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगु द्या असा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांनी जगाला सत्य, अहिंसेची, प्रेमाची शिकवण दिली. भगवान महावीर यांनी नेहमी समाजाला प्रेम, अहिंसेचा मार्ग दाखवला. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी त्यांनी समाजाला प्रोत्साहित केले. आज प्रत्येक व्यक्ती कोणत्याना कोणत्या समस्येने ग्रासला आहे. जर प्रत्येकाला चिंतामुक्त जीवन जगायचे झाल्यास महावीरांचे बहुमोल विचार उपयोगी पडणार आहेत. त्यांच्या विचारांना स्वत:च्या आचरणात आणून त्याचे पालन करणे हे खऱ्या अर्थाने भगवान महावीरांना अभिवादन ठरेल असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.
सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने कोपरगाव येथे काढण्यात आलेल्या रथ यात्रेत ना. आशुतोष काळे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भगवान महावीरांना अभिवादन करून त्यांचे मनोभावे दर्शन घेतले याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.
यावेळी संघपती प्रेमचंदजी भंडारी, प्रविणजी गंगवाल, विजयजी पहाडे, संजयजी बंब, प्रविणजी दोशी, सुनीलजी बेदमुथा, महावीरजी दगडे, अशोकजी पापडीवाल, डॉ. अमोलजी अजमेरे, दिपकजी अजमेरे, अमितजी लोहाडे, अनिलजी काले, कैलासजी ठोळे, डॉ. दगडे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, माजी नगरसेवक मंदारजी पहाडे, तुषारजी बागरेचा अजयजी शहा, श्री भंडारी, सचिनजी ठोळे, सुरेंद्रजी ठोळे, आनंदजी दगडे, सी.डी. ठोळे, राजेंद्रजी गंगवाल, पियुषजी गंगवाल, आनंदजी पहाडे, आनंदजी काले, संतोषजी गंगवाल, प्रियाताई अजमेरे, आरतीताई गंगवाल, प्रेमाताई बज, सोनलजी अजमेरे आदींसह ट्रस्टी व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ:– भगवान महावीर यांच्या यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रथयात्रेत सहभागी होवून अभिवादन करतांना ना. आशुतोष काळे.
