
कोपरगांव प्रतिनिधी:-
स्वराज्य आणि धर्मनिष्ठा जोपासुन शुरविर संभाजीराजेंनी मुघल साम्राज्याशी कडवी झुंज देत १२० युद्ध खेळून ती जिंकली आणि मराठेशाहीचे अस्तित्व अबाधीत ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे स्वराज्य घडविण्यांत शूरवीर संभाजीराजे यांनी मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
कोपरगाव शहर व तालुका भाजपाच्यावतीने धर्मवीर संभाजीराजेंचा राज्याभिषेक दिन रविवारी साजरा करण्यांत आला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रारंभी अकरा जोडप्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज स्मारकास दुग्धाभिषेक घालून पूजा करण्यात आली, कोपरगाव शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अविनाश पाठक यांनी प्रास्ताविक केले.

सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, शुरवीर संभाजीराजे यांनाा वयाच्या अवघ्या नवव्यावर्षी छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या आग्राहून सुटकेचा थरार अनुभवयाला मिळाला. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या चौदाव्यावर्षी त्यांनी बुधभूषण ग्रंथ लिहीला होता. केशवभट आणि उमाजी पंडीतांच्या तालमीत त्यांचे शिक्षण झाले. परकीय लेखकांनीही त्यांच्या युद्धनितीची वाहवा केली. गागाभट यांच्याकरवी त्यांनी नितीमुल्यांची शिकवण देणारा समयनय ग्रंथ लिहून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजानंतर संभाजीराजेंनी चिंचवड मोरगांव गणपती, सज्जनगड, चाफल, हिंगणवाडी आदि देवस्थानांची देखभाल करत धर्म जोपासण्यांचे महान काम केले असे त्या म्हणाल्या. या प्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, ह. भ. प. राघवेश्वर महाराज उंंडे, भाजपा गटनेते रविंद्र पाठक, माधवराव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष .विजय वाजे,युवा मोर्चा शहराध्यक्ष पाठक, बाळासाहेब आढाव, वैभव आढाव, जितेंद्र रनशूर, गोपी गायकवाड, .रवींद्र रोहमारे, अल्ताफभाई कुरेशी, प्रसाद आढाव, .निलेश बोऱ्हाडे, शेतकरी सेलचे अध्यक्ष सतिष रानोडे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष खालीकभाई कुरेशी,प्रभूदास पाखरे, अजय सुपेकर, छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य,महिला भगिनी,युवक,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
