कोपरगाव प्रतिनिधी:-
जैन बांधवांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या कनार्टकातील श्रवणबेळगोळ येथुन पायी पदयात्रेने निघालेल्या वात्सल्यवारीधी राष्ट्रगौरव जैनमुनी आचार्य श्री १०८ वर्धमानसागर महाराज व त्यांचे समवेत ४० तपस्वी जैनमुनींचे कोपरगांवात भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी शनिवारी स्वागत करत या महाराजांचे आर्शिवाद घेतले.
नोव्हेंबर २०२२ मध्ये राजस्थान येथील महावीरजी तीर्थस्थानावर महामस्तकाभिषेक कार्यक्रम असुन त्यासाठी हे जैनमुनी दररोज दरमजल दहा किलोमिटर पायी प्रवास करत आहेत. पायी पदयात्रेने ते नोव्हेंबर मध्ये राजस्थानात पोहोचणार आहेत. सध्या कडाक्याची थंडी असुनही हे तपस्वी दररोज पायी प्रवास करतात. या तपस्वीबरोबरच अन्य १०० जैन भक्तगणही या पदयात्रेत सामिल झालेले आहे. कोपरगांव पंचकोशीतील जैन बांधवांनी त्यांचे गोदावरी नदी काठी स्वागत केले.
याप्रसंगी कोपरगांव पिपल्स बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, बाळासाहेब नरोडे, वैभव आढाव, गोपीनाथ गायकवाड, .किरण सुपेकर,.सचिन सावंत, .सतिश रानोडे, .खालिकभाई कुरेशी,.फकीरमंहमद पहिलवान,.निलेश बोऱ्हाडे,.सोमनाथ म्हस्के, चंद्रकांत वाघमारे, जगदीश मोरे आदि उपस्थित होते.

फोटोओळी-कोपरगांव
वात्सल्यवारिधी जैनमुनी राष्ट्रगौरव आचार्य श्री १०८ वर्धमानसागर महाराज व त्यांचे समवेत ४० तपस्वी जैनमुनींचे कोपरगांवात भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी स्वागत केले
