
कोपरगाव प्रतिनिधी :- तरुणामध्ये देशभक्तीची विचारधारा पेरण्याचे काम देशभक्ती सेवा मंचच्या माध्यमातुन केले जाते.तरूणांना संस्कार त्याच बरोबर आपली संस्कृती आणि देश हिताचे रक्षण करुन या सर्व विषयावर चर्चा संमेलन जनजागृती करण्याचे कामकाज देशभक्ती सेवा मंचच्या माध्यमातुन केले जात असते.देशभक्ती सेवा मंचच्या कार्याची दखल यापुर्वी राष्ट्रपती त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा घेतली आहे.स.न.२१-२२ ची कार्यकरणी बैठक लुम्बीनी वन या ठिकाणी संपन्न झाली.या बैठकीत पत्रकार रवींद्र जगताप यांची अध्यक्ष पदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली.अल्ताफ शहा उपाध्यक्ष, संतोष जगताप सचिव,गणेश रणशूर कार्याध्यक्ष,कृणाल किर्तीकर संघटक,अरबाज शेख सेक्रटरी,वासिम शेख सहसंघटक,सुनिल वाहुळकर खजिनदार, बाबासाहेब सातुरे सह खजिनदार,संजय भारती प्रसिध्दी प्रमुख,विशाल आव्हाड संरक्षण प्रमुख,अँड अमोल मगर कायदेशीर सल्लागार, राजेंद्र घोडेराव सल्लागार, नानासाहेब मोरे मार्गदर्शक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.उपस्थित सदस्यांनी नविन कार्यकरणीस शुभेच्छा देवुन पुढील वाटचालीस मंगलकामना व्यक्त केल्या आहे.
