कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- मागील काही वर्षापासून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला होता. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून ५ नंबर साठवण तलावाच्या कॉंक्रीटीकरण व वितरिकांसाठी १२० कोटी १२ लाख रुपये निधीला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. याबद्दल नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चैतन्य व उत्साह पसरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इम्तियाज अत्तार यांनी प्रभाग क्र. ७ मध्ये पेढे वाटून आपला आनंद नागरिकांसोबत साजरा केला.
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेला संघर्ष संपूर्ण कोपरगाव शहरातील नागरिक जाणून आहेत. त्यांनी केलेल्या विविध आंदोलनात शहरवासीयांनी वेळोवेळी सहभागी होवून आपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली होती. व निवडून येताच दोनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदकाम पूर्ण करून कोपरगाव नगरपालिकेचा जवळपास ७ कोटीचा खर्च वाचविला आहे. व पुढील काम तातडीने पूर्ण करण्यासाठी १२० कोटी १२ लाख रुपयांची तांत्रिक मंजुरी मिळवून एक पाऊल पुढे टाकले आहे.याचा शहरातील नागरिकांबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील मोठा आनंद झाला आहे. आपला आनंद साजरा करण्यासाठी मागील काही दिवसांपासून कार्यकर्ते आपापल्या प्रभागात पेढे वाटप करीत असून लवकरच महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असल्याचे महिला-भगिनींना सांगत आहे.

फोटो ओळ:- ५ नं.साठवण तलावाला १२० कोटी तांत्रिक मंजुरी मिळाल्याबद्दल पेढे वाटप करतांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. पाण्याची चिंता मिटणार असल्यामुळे महिला भगिनींचा चेहऱ्यावर दिसत असलेला आनंद.
