निसर्गाची साथ अजून ४-५ वर्षे कायम राहिल्यास पूर्वभागात जलसमृद्धी होईल:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान असलेल्या कोळनदीचे तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने व जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत पुर्नरज्जीवन केल्याने त्याचा मोठा फायदा याभागातील शेतकऱ्यांना यंदाचे पावसाळी हंगामात होत असून यावरील सर्व साठवण बंधारे ओव्हरफ्लो होऊन वहात आहे.
पूर्व भाग हा नेहमीच पाण्यांपासून वंचित राहिलेला आहे., येथे जलसमृध्यी व्हावी यासाठी संजीवनीचे प्रयत्न सुरू आहे. येथील आपेगांव, शिरसगांव, तिळवणी, उक्कडगाव, कासली, वांरी, कान्हेगांव, तळेगांवमळे, घोयेगाव या गावात कोळ नदी मूळ पाण्यांची समृद्धी तयार झाली आहे. कोळनदी सध्या वाहती झाली आहे. कोलनदी पुर्वी गाळाने पुर्णपणे भरली होती. यात पावसाचे पाणी यायचे पण त्याचे भुगर्भात पुर्नभरण होण्यास अडथळे येत होते. त्यासाठी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी बिपीनदादा कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली यावर काम केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून साडेनउ कोटी रुपयांचा निधी मिळवुन को कोळनदीचे पुर्नरज्जीवन केले त्यासाठी नाशिक पाटबंधारे विभागाने सुरुवातीला आढेवेढे घेतले पण तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मोठा पाठपुरावा केला. संजीवनी उद्योग समुहाचे बिपीनदादा कोल्हे यांनी पूर्व भागात कारखाना व कपार्ट योजनेअंतर्गत पाणी अडवा-पाणी जिरवा उपक्रमाद्वारे साठवण बंधारे, गोडबोले गेट बंधारे, दगडी-मातीचे बंधारे, शेततळे घेऊन पाणलोट क्षेत्राचे काम केले त्याचा फायदा चालू पावसाळ्यात होत आहे. त्यातच जलयुक्त शिवार अंतर्गत शेतकरी व या भागातील रहिवासीयांना प्रोत्साहन देऊन त्याचेही काम मोठ्या प्रमाणात उभे केले आहे. त्याचप्रमाणे तालुक्याच्या पश्चिम भागातही जलयुक्त शिवार अभियान राबविले भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे त्यासाठी पाण्यांच्या पुर्तभरणाला संजीवनी उद्योगसमुहाने पाठबळ दिले असल्याचे सौ. कोल्हे म्हणाल्या. पुर्वभागात नागपुर मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्यात आहे. त्यासाठी मुरूम-मातीचा भराव शेतकत्यांनी दिला त्यांनाही पर्जन्य राजाचा फायदा होऊन संबंधीत तयार झालेल्या तळ्यात पाण्यांचा मोठा साठा निर्माण झाला आहे. परिणामी आसपासच्या विहीरीना तसेच ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहारीस पाण्याचा पाझर वाढला आहे. निसर्गाची साथ अजून ४-५ वर्षे कायम राहिल्यास पूर्वभागात जलसमृद्धी होईल असे सौ स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *