कोपरगावच्या विकासावर वरवंटा फिरविणाऱ्या काळे कुटुंबाचा विळखा जनता तोडणार:- पंडितराव भारुड…

कोपरगाव प्रतिनिधी:-आशुतोष काळे यांचे एकही ठोस काम जनतेला दिसत नाही आणि रस्ते वीज पाणी या समस्या अक्षरशः टोकाला गेल्या आहेत.तालुक्याचे पाणी घालवणारे काळे कुटुंब आहे पण ओढून ताणून आपले पाप झाकण्याचा प्रयत्न ते करतात.युवकांना रोजगार देण्यासाठी त्यांचे प्रयत्न नाही तर या उलट पंचवीस हजार कुटुंबाला रोजगार मिळण्यापासून वंचित ठेवले.ज्यांचे काम फक्त घालवणे आहे त्या काळे […]

Read More

‌काकडी गावचे हक्काचे कराचे पैसे थकवून आमदार काळे यांच्या विकासाच्या खोट्या गप्पा:- पूर्वा गुंजाळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-काकडी येथे विमानतळाच्या नवीन टर्मिनल च्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला.केंद्र सरकार असे विविध उपक्रम जनतेसाठी राबवते त्याचे स्वागत आहे.मात्र स्थानिक यंत्रणेने या कार्यक्रमात काकडी गावच्या प्रथम नागरिक सरपंच पूर्वा गुंजाळ यांना डावलण्यात आले व ज्यांचा काकडीच्या विकासाशी कवडीचा संबंध नाही अशा आमदार आणि पालकमंत्र्यांनी श्रेयवादासाठी फक्त मिरवण्याचे काम केले आहे. […]

Read More

पंचवीस हजार युवकांच्या अन्नात माती कालवणाऱ्या आ.काळे यांना रोजगारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही – दिपक चौधरी…

अवैध धंद्यांचा रोजगार वाढवणाऱ्या आ.काळे यांनी संजीवनी रोजगार मेळाव्यावर बोलणे हास्यास्पद…कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी नोकरी महोत्सवामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या आमदार आशुतोष काळे यांनी आपले रोजगारासाठी योगदान काय याचा विचार करावा. हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे मात्र काळे कुटुंबाने आजवर किती रोजगार तालुक्यात आणला हे जनतेसमोर मांडावे. त्यांच्या निगडित […]

Read More

सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकच्या नृत्यकलाविष्काराने दांडिया स्पर्धकांचा उत्साह वाढविला…

दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना आ. आशुतोष काळे व सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आणि याच नवरात्र उत्सवानिमित्त आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दांडिया स्पर्धेला अनेक कलाकारांसह महिला भगिनींनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. या दांडिया स्पर्धेच्या माध्यमातून संस्कृती, नृत्य आणि सामुदायिक […]

Read More

औद्योगिक वसाहतीला विळखा घालून बसलेल्या कोल्हेंकडून रोजगार मेळाव्याचा देखावा:- रावसाहेब चौधरी…

सर्व सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळण्याची कोल्हेंची जुनी सवय…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- औद्योगिक वसाहतीत रस्ते धड नाही, अरुंद रस्ते, पाणी, कचरा, सांडपाणी प्रश्न, वसाहतीत पायाभूत सोयी सुविधांचा मोठा अभाव असून उद्योजक वैतागले आहेत. समस्यांचा महापूर असल्यामुळे औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग यायला तयार नाही. जे उद्योग सुरु आहे त्यांनाही कोल्हेंच्या राजकीय दबावाखाली उद्योग-व्यवसाय करावा लागत असून अनेक […]

Read More

गोदावरी कालवे दुरुस्तीच्या १९५.१७ कोटीच्या निविदा प्रसिद्ध ३०० कोटीपैकी पाच वर्षात २७० कोटी निधी उपलब्ध:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जवळपास एकशे दहा वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या गोदावरी कालव्यांची वहन क्षमता कमी होवून सिंचनावर होणारा परिणाम दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी निवडणुकीपूर्वी गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचे दिलेले आश्वासन पूर्ण करतांना ३०० कोटी निधीला मंजुरी मिळविली होती. त्या निधीतून आजवर ७२ कोटीची कामे पूर्ण झाली असून पुढील कामांसाठी १९५ कोटीच्या कालवे दुरुस्तीच्या निविदा […]

Read More

अखेर भगवान वीर एकलव्य पुतळ्याची जागा ठरली आ. आशुतोष काळेंकडून आदिवासी बांधवांना दिलेला शब्द पूर्ण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी अनेक वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील आदिवासी बांधवांची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात धारणगाव रोडला भगवान वीर एकलव्य यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा निश्चित केली आहे.कोपरगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज असून या आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान […]

Read More

कोपरगाव येथे आदिवासी महादेव कोळी समाजाचे विविध मागण्यासाठी २ ऑक्टोबर पासून बेमुदत धरणे आंदोलन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव वार्ताहर – कोपरगाव येथे आदिवासी महादेव कोळी युवक संघ जिल्हा शाखा अहमदनगर यांच्या वतीने विविध मागण्यासाठी 2 ऑक्टोबर 2024 पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक शेजारी खालील मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे.१) धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये. २ ) मान. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितल्यानुसार जात पडताळणी समित्या […]

Read More

कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेबांच्या तिसऱ्या पिढीतील विवेक भैय्या कोल्हे यांनी एकाच छताखाली एका दिवसात ३१२४ युवकांना नोकऱ्या उपलब्ध करुन देतांना मारला लाजवाब मास्टर स्ट्रोक:- जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांनी आपल्या आयुष्यातील ७० वर्षे अहोरात्र शेतकरी, शेतमजूर , छोटे व्यावसायिक, व्यापारी,महिला यांना स्वबळावर मजबूत पायावर उभे करण्यासाठी सर्वस्व अर्पण केले. याचमुळे या कोपरगांव तालुक्यात शेतकऱ्यांवर साठ वर्षांच्या कालावधीत आत्महत्या करण्याची वेळच आली नाही. हाच वारसा अखंडपणे संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन […]

Read More

पत्रकार नानासाहेब जवरे यांना मातृषोक…

कोपरगाव प्रतिनिधी:-निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख व राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे यांच्या मातोश्री गं.भा.गंगुबाई जयराम जवरे (वय-८२)यांचे मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.स्व.गंगुबाई जवरे या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या व कष्टाळू म्हणून जवळके आणि परिसरात परिचित होत्या.त्यांच्या पश्चात पत्रकार नानासाहेब […]

Read More