सोमैया महाविद्यालयात महिला उद्योजकता विषयावर व्याख्यान संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:-“विद्यार्थिनींनी आता दुसऱ्याकडे रोजगार किंवा नोकरी मागण्यापेक्षा स्वतःच उद्योजक होऊन दुसऱ्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करावा. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास हे सहज शक्य आहे. मी स्वतः हा अनुभव घेते आहे. मीही आधी प्राध्यापिका होते, परंतु आता या क्षणी मी एक उद्योजक आहे आणि अनेकांना मी रोजगार उपलब्ध करून देत आहे.” असे प्रतिपादन श्रीमती मनिषा बारबिंड यांनी […]

Read More

आमदार काळे यांच्या खोट्या वल्गनांना कंटाळून अनेकांचा कोल्हे गटात प्रवेश…

ब्राम्हणगाव येथे काळे गटाला खिंडार पडले असून आमदार काळे यांच्या फसव्या कार्यशैलीवर नाराज होऊन अनेकांनी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे विश्वासू नेतृत्व स्वीकारले आहे.निवडणूक तोंडावर असताना हजारो कोटींचे केवळ आकडे आहेत मात्र प्रत्यक्षात कुठेही नागरी सुविधा नाहीत. रस्ते अक्षरशः फुटले असून दळणवळण अडचणीचे झाले आहे यामुळे सर्व नागरिक त्रस्त आहेत.यामुळे अनेकांचा ओढा कोल्हे गटात वाढला आहे.यावेळी […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मोकाट जनावरे सोडून अवमान , शिवप्रेमींनी केला आ.काळे आणि प्रशासनाचा निषेध…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगर परिषदेच्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मोकाट जनावरे कोंडण्याचा गैरप्रकार करून अस्मितेला धक्का लावण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नसल्याने मोकाट जनावरांनी गेल्या अनेक वेळा नागरिकांना जखमी केल्याचे अनेक उदाहरणे ताजे आहे.जर उद्यानात या जनावरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला काही धक्का लावला आणि अवमान झाला तर त्यालाही प्रशासन आणि […]

Read More

महसूल विभागाच्या ऐतिहासिक निर्णयांचा कोपरगाव मतदार संघाला फायदा:-आ.आशुतोष काळे…

खंडकरी शेतकऱ्यांना वर्ग १ च्या सात बारा उताऱ्यांचे आ. आशुतोष काळेंच्या हस्ते वितरण…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- खंडकरी शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेल्या त्यांच्याच जमिनीच्या उताऱ्यावर भोगवटादार २ अशी नोंद येत असल्यामुळे स्वत:ची जमीन असून सुद्धा त्या जमिनीचे हस्तांतरण होत नव्हते. त्यामुळे त्या जमिनीच्या उताऱ्यावर असलेली भोगवटादार २ हि नोंद रद्द करून भोगवटादार १ करावे अशी असंख्य खंडकरी […]

Read More

गौतम सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय आगवन यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक अशी ओळख असलेल्या गौतम सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय कारभारी आगवन यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी दिली आहे.गौतम सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुधाकर दंडवते यांचे काही महिन्यांपूर्वी अकस्मात निधन झाल्यामुळे रिक्त असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गौतम सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सभा […]

Read More

विकासाच्या मागे उभे रहावे:- आ. आशुतोष काळे…

आ.आशुतोष काळेंमुळे कोपरगावला अच्छे दिनकोपरगाव शहरालगत होणारी एमआयडीसी क्रांतिकारी निर्णय-काका कोयटे… भूमिगत गटारीसाठी २८० कोटी निधी दिल्याबद्दलव्यापारी महासंघाच्या वतीने आ.आशुतोष काळेंचा नागरी सत्कार…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न एकाच पंचवार्षिकमध्ये ५ नं.साठवण तलावाच्या माध्यमातून आ. आशुतोष काळे यांनी सोडविला आहे. त्यांनी एवढ्यावरच न थांबता भूमिगत गटारींसाठी व सिवेज ट्रीटमेंट प्लँटसाठी देखील २८० कोटी […]

Read More

आ.आशुतोष काळेंचा धामोरीत कोल्हे गटाला पुन्हा धक्का उपसरपंच शिवाजीराव वाघ यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोल्हेंच्या कार्यपद्धतीला त्यांचे कार्यकर्ते चांगलेच वैतागलेले दिसत असून त्यांच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीत इनकमिंग सातत्याने सुरु आहे. कोल्हेंच्या अनेक सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कोल्हे गटाला सोडचिट्ठी देत असून मागील काही दशकांपासून एकनिष्ठ असलेले धामोरीचे उपसरपंच शिवाजीराव वाघ यांनी देखील नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.आ.आशुतोष काळे यांनी […]

Read More

हाळगाव कृषि महाविद्यालय हे कृषि शिक्षणाचे दीपस्तंभ ठरेल:- माजी मंत्री आ . प्रा. राम शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी(हाळगाव):-प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाची सुरुवात झाली. सध्याही येथील विद्यार्थ्यांसमोर काही आव्हाने उभे आहेत.या प्रतिकूल परिस्थितीवर जो मात करेल तोच यशाला गवसणी घालेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हाळगाव भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कृषि शिक्षणाचे दीपस्तंभ आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र ठरेल असे प्रतिपादन माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी केले.महात्मा फुले […]

Read More

संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

एकरूखे गावातील विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- गारपीट, अवकाळी, दुष्काळ अशा विविध संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अनुदानाचे वेळोवेळी वितरण केले आहे. यापुढेही संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील एकरूखे गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन […]

Read More

उद्योजकांनी रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे:- उद्योगमंत्री उदय सामंत

एमआयडीसीमुळे शिर्डी औद्योगिक हब’ म्हणून नावारूपाला येईल:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…शिर्डी औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व‌ डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- एमआयडीसी व डिफेन्स क्लस्टरमुळे शिर्डी व परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे, उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगारासाठी प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केली.सावळी विहीर येथे शिर्डी महाराष्ट्र राज्य […]

Read More