जीवनात यशस्वीतेसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा:- प्रा.साहेबराव दवंगे ; वारीत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर, टेके पाटील ट्रस्ट चा उपक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी :-दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरचा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमातून आणि मिळवलेल्या गुणातून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासाचे गणित अवलंबून असते. मात्र अशाही परिस्थितीमध्ये कमी गुण मिळाले तरी विद्यार्थ्यांनी खचून न जाता स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर शिक्षणातील कोणताही पर्याय निवडून परिश्रम घेत आपल्या जीवनात यशस्वी होता येते. मात्र; हे सर्व करताना संस्कारही तितकेच […]

Read More

गावोगावी असणाऱ्या बस थांब्यांची पुनर्बांधणी करा – युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघात सध्या विविध गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांचे शासकीय स्तरावर काम सुरू असून, या रस्त्यांच्या कामांच्या दरम्यान अनेक ठिकाणी शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बस थांब्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. काही ठिकाणी हे बस थांबे हटवून टाकण्यात आले असून, काही ठिकाणी ते अर्धवट अवस्थेत उध्वस्त झालेले आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी […]

Read More

पर्यावरण रक्षणासाठी नाविन्यपूर्ण संशोधनाची गरज:- सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-पर्यावरण जपणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे. येणार्या नव्या पिढीसमोर पर्यावरण जपण्याचे खूप आव्हान आहे. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्लास्टिकचा वापर करतो. हेच प्लास्टिक पर्यावरणातील हवा, पाणी व जमीन प्रदूषित होण्यास कारणीभूत ठरते. प्लास्टिकला पर्याय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती उपयोगी ठरणार आहे. शासनस्तरावर उद्योजकांसाठी खूप सार्या योजना आहेत. तरुण उद्योजक विद्यार्थ्यांनी आपली […]

Read More

कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुनिल कदम उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्काराने सन्मानित…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख व काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील कदम यांना उत्कृष्ट कृषि संशोधक 2025 या पुरस्काराने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषि शिक्षण […]

Read More

गंगा दशहरा निमित्ताने कोपरगांवात गंगा-गोदावरी पुजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने गंगा दशहरा निमित्ताने कोपरगांवातील गोदातीरावर गंगा-गोदावरी पुजन संत रामदासी बाबा भक्त परिवाराचे सौ. शोभादेवी आणि श्री शरदनाना थोरात या उभयतांच्या शुभहस्ते जेष्ठ शुध्द दशमी शके १९४७ तिथीनुसार गंगा दशहरा साजरा करण्यात आला आहे. प्रभु श्रीराम यांचे पुर्वज राजा सगर यांचे पुत्रांना कपिल मुनींच्या […]

Read More

शासकीय आय टी आय च्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी रामेश्वर कानडे यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्व सूर्यभान वहाडणे पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोपरगाव या संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी वारी येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते व्यवसायाने मॅकॅनिकल इंजिनिअर असणारे श्री रामेश्वर सतिश कानडे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहेमहाराष्ट्र राज्यातील तिनशेहुन अधिक शासकीय आय टी आय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात […]

Read More

कृषी विभागाच्या शंभर टक्के अनुदानीत बियाण्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे मिळावीत यासाठी महाडीबीटी पोर्टल या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरलेले होते. त्या पात्र शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अनुदानित बियाण्याचे वाटप सुरू करण्यात आले असून लाभधारक शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रमाणित अनुदानित […]

Read More

ऐतिहासिक जलसंपत्तीच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय – पुणतांबा गोदावरी घाटाचा समावेश ;पुणतांबा गोदावरी घाट विकासासाठी विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीला यश…

कोपरगाव प्रतिनिधी:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यादेवींनी उभारलेल्या ऐतिहासिक जलसंपत्तींच्या जतनासाठी एक महत्त्वपूर्ण आणि लोककल्याणकारी निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. दिनांक ६ मे २०२५ रोजी मौजे चौंडी, ता. जामखेड, अहिल्यानगर येथे मंत्री परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव राखण्यासाठी व ऐतिहासिक जलसंपत्तीचे जतन करण्याच्या दृष्टिकोनातून व्यापक योजना आखण्यात आली.यात […]

Read More

कोपरगाव शहरातील व्यापारी महासंघाने वतीने श्री.सतीशशेठ कृष्णाणी यांना “जीवनगौरव पुरस्कार” देण्यात आला आहे हार्दिक अभिनंदन:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज कोपरगाव शहरात श्री.सतीश शेठ कृष्णाणी यांचे नाव मोठे आदाराने घेतले जाते. फाळणीनंतर ते 1966 साली कोपरगाव आले,खंदक नाला परिसरात एका टेबलावर ऑटो स्पेअर सुरू केले. त्यानंतर रनवेल बॅटरी या नावाने व्यवसायत पर्दापण केले. त्या काळात स्व.मुरलीधर भाऊ लोणारी यांचे महाराष्ट्र गॅरेज कोपरगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या आशीर्वादाने श्री.सतीशशेठ कृष्णाणी […]

Read More

कोपरगावातील “कालांश राजगिरा लाडू” उत्पादक श्री.रोहित काले यांना कर्तुत्व गौरव पुरस्कार व्यापारी महासंघाच्यावतीने देण्यात आला रोहित काले यांचे हार्दिक अभिनंदन:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-राजगिरा लाडू तस पाहिल तर सर्वसामान्य व सर्वमान्य खाद्य वस्तू लहान मुलांपासून वृद्ध माणसाला राजगिरा लाडू खायला आवडतो. त्यामुळे त्याची मागणी ही जास्त असते. उपवास असल्यास घरो-घरी राजगिरा लाडूचा खप वाढतो. नेमके हीच बाजू हेरुन चाणक्य व हुशार रोहित काले यांनी सुरुवातीला लहान प्रमाणात राजगिरालाडू चे उत्पादन चालू केले. उत्पादन वितरण सर्व व्यवस्था ते […]

Read More