एक्स्पोच्या माध्यमातून कोपरगाव शहर व तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला चालना :- आ.आशुतोष काळे…

कोपरगावात ‘एक्स्पो २०२६’ चे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दरवर्षी एक्स्पोच्या माध्यमातून कोपरगावकरांना नवीन काय देता येईल आणि त्याचा कोपरगाव आणि तालुक्याला कसा फायदा होईल याचा प्रयत्न सातत्याने मागील १३ वर्षापासून होत असून एक्स्पोच्या माध्यमातून कोपरगाव शहर व तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. कोपरगाव शहरातील […]

Read More

निळवंडे कालव्याचे पाणी वितरिका क्र.०३ द्वारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत; वेस-सोयगाव, काकडीच्या शेतकऱ्यांनी मानले आ.आशुतोष काळेंचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती गावाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्याचे पाणी आ.आशुतोष काळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून जिरायती भागात ओढ्याच्या माध्यमातून पोहोचले आहे. परंतु बुधवार (दि.११) रोजी प्रमुख वितरीकाद्वारे हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले असून त्यामुळे आनंदी झालेल्या वेस-सोयगाव, काकडीच्या शेतकऱ्यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करून […]

Read More

गावी सत्काराने जबाबदारीची जाणीव; काम करण्यास नवी प्रेरणा :- दत्तात्रय वर्पे…

कोपरगाव प्रतिनिधी:-“ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. गावी झालेला हा सत्कार मला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. सामाजिक प्रश्नासाठी सातत्याने २२ वर्षे अंदोलने केली.शिवसेनेशी २२ वर्षे असलेली निष्ठा फळाला आली.बड्या शक्तीविरुध्द लढतांना मोठा त्रास झाला.पण जनतेने निवडणुक हातात घेतली होती.निवडुन आलेल्या ठिकाणचे पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य तसेच शेतकरी व […]

Read More

कोपरगावच्या प्रगतीसाठी महिलांना नेतृत्वाची संधी; विश्वासनाम्याची पूर्तता करण्याकडे वाटचाल :- सौ. रेणुकाताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येत योग्य निर्णय घेतला असून योग्य व्यक्तींना योग्य जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘विश्वासनामा’ची पूर्तता करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून महिलांना सभापती पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.महिला सक्षम असून त्या कोणतेही कार्य चिकाटीने पूर्ण करतात. अनेक वर्षांपासून कोल्हे परिवार […]

Read More

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध प्रश्नांबाबत भेट ;कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक चर्चा…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय येथे युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सदिच्छा भेट घेत कोपरगाव शहर व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली.या भेटीदरम्यान धोत्रे, नाथगंगा, बापतरे, पुरणगाव आदी परिसरातील सुमारे ५००० एकर क्षेत्रावर प्रस्तावित असलेला आणि २०१९ पासून प्रलंबित असलेला स्मार्ट सिटी प्रकल्पासह संबंधित शेतकरी बांधवांच्या चार प्रमुख मागण्यांबाबत […]

Read More

कोपरगाव तहसीलच्या इमारतीस स्व.अजितदादांचे नाव देवून त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारा, आ.आशुतोष काळेंची महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळेंकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्याच्या विकासगाथेत सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी असे कार्य असणाऱ्या स्व.अजितदादांनी राजकारण करतांनाही नेहमी समाजहित कसे जोपासले जाईल याचा प्रामुख्याने विचार केला. दूरदृष्टी आणि जनहिताची अखंड तळमळ जपणारे स्व.अजितदादा हे एक प्रभावी व लोकाभिमुख नेतृत्व होते. त्यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासासाठी मोलाचे योगदान दिले आहे.त्यामुळे त्यांच्या अजोड योगदानाची आठवण कायमस्वरूपी राहून त्यांच्या कार्याची […]

Read More

गोदावरी कालव्यांना सिंचनासाठी आवर्तन सोडा आमदार आशुतोष काळेंचे पाटबंधारे विभागाला निर्देश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा,कांदा,मका आदी पिके जोमात आहे. काही भागात तर गहू, कांदे, हरभरा या पिकांना केवळ शेवटच्या पाण्याची आवश्यकता असून लाभ क्षेत्रातील सर्व ऊस पिकांच्या तोडी झाल्यामुळे खोडव्यांच्या मशागती सुरू असून त्यांना देखील सिंचनासाठी पाणी लागणार आहे. त्यामुळे रब्बी […]

Read More

ऊस पिकावरील हुमणी किड नियंत्रणासाठी प्रकाशगंध सापळयांचा वापर वाढवावा :- डॉ. योगेश थोरात…

कोपरगांव प्रतिनिधी:-वाढते भूवैश्मीकीकरण आणि पर्यावरणातील बदलामुळे उस पिकासह अन्य पिकावर हुमणी किडीचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणांत वाढला आहे तेंव्हा शेतक-यांनी त्याच्या नियंत्रणासाठी प्रकाशगंध सापळयांचा वापर वाढवावा असे आवाहन शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, भारतीय उस संशोधन संस्था लखनौ व जैविक नियंत्रण केंद्र प्रवरानगरच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्षेत्रातील […]

Read More

झाडे गेरु आणि चुना लेपणाने टिकवावी :- पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके यांचे आवाहन…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान वृक्षसंवर्धन अभियान यशस्वी करण्याचे आवाहन…कोपरगांव प्रतिनिधी:-झाडाला (विशेषतः खोडाला) कीड व बुरशीपासून संरक्षण, कडक उन्हापासून बचाव आणि झाडाचे आरोग्य राखण्यासाठी चुना आणि गेरू लावल्याने त्यांचे आयुर्मान वाढते. झाडांमुळे सजीवांच्या प्राणवायूचा समतोल राखण्यासाठी लोकसहभागातून हे काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयात ‘विद्यार्थी सहभाग परिसंवाद’ संपन्न …

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय येथे दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत ‘विद्यार्थी सहभाग परिसंवाद’ संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आयोजित या परिसंवादासाठी ‘शाश्वत विकास, युवती सुरक्षेमध्ये माझी भूमिका, विकसित भारत माझे स्वप्न- माझा आराखडा, […]

Read More