अहमदनगरच्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला सावळविहीर कृषी विज्ञान केंद्राची 75 एकर जागा देण्यास मान्यता….

पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बैठकीत निर्णय…कोपरगाव(शिर्डी) प्रतिनिधी :-उत्तर महाराष्ट्रात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय नसल्याने पशुपालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अहमदनगर जिल्ह्यात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय झाल्यास याचा लाभ पशुपालकांना होणार असून त्यानुसार अहमदनगरमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला सावळविहीर येथील कृषी विज्ञान केंद्राची ७५ एकर जागा देण्यास आज मान्यता […]

Read More

कोपरगाव नगरपालिका शाळा नं.५, बेट येथे इयत्ता सातवीच्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-विद्यार्थ्यांचे प्रेम, निरोपाची फ्रेम शालेय निरोप समारंभ म्हणजे आठवणी ठेवून जाणे व आठवणी घेऊन जाण्याचा अविभाज्य भाग! नुकताच कोपरगाव नगरपालिका शाळा नं.५, बेट येथे इयत्ता सातवीच्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनीच बालसभा आयोजित करून केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास माळी हे होते. […]

Read More

“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर” हे खरे भारताचे निर्माते व राष्ट्र उभारणीकर्ते:- प्रा.सुभाष रणधीर…

कोपरगाव प्रतिनिधी:- २१०० वर्षापूर्वीपासून प्रवाह-पतीत अशा मनूव्यवस्थेचा पगडा असलेला भारत देश हा विविध जाती धर्मात विखुरलेला देश होता. ‘ब्राह्मण’ आणि ‘श्रमण’ असे दोन मुख्य वर्ग असलेल्या या देशाला रूढीग्रस्ततेने वेढलेले होते. त्यामुळे ब्रिटिश राजवटीचे आगमन ही या देशासाठी प्रबोधनाची पहाट ठरली. कारण या राजवटीत शाळा व शिक्षणाची सोय झाली. शाहू, फुल्यांद्वारे सामाजिक सुधारणांची सुरुवात झाली. […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलच्या आस्वाद मेस विभागाला आयएसओ मानांकन…

कोपरगाव प्रतिनिधी:- युनायटेड किंग्डम येथील आंतरराष्ट्रीय मानक संघटनेकडून (इंटरनॅशनल स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन) समता इंटरनॅशनल स्कूलमधील मेस विभागाला गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली व अन्न आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत आयएसओ 9001 व 22000 असे दर्जेदार व्यवस्थापन पद्धत व फूड सेफ्टी दर्जा प्रमाणित मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले असून समता इंटरनॅशनल स्कूलच्या मेस व किचन विभागाच्या कार्यकारी विश्वस्त सौ.सुहासिनी कोयटे […]

Read More

केवळ गुण पत्रिकेवरील गुण महत्वाचे नाही तर बहुआयामी व्यक्तिमत्व जरूरी:- डाॅ.महेंद्र चितलांगे…

संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये टेक-मंत्रा२के२३ याराष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटनकोपरगांव प्रतिनिधी:- स्पर्धेतील यश अपयश महत्वाचे नसुन स्पर्धेत भाग घेणे म्हणजेच आत्मविश्वास प्रदर्शित करणे असा आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वच स्पर्धकांचा आत्मविश्वास हा त्यांना या महाकाय विश्वातील वेगवेगळी आव्हाने पेलण्यासाठी पुरक ठरतो. स्पर्धेतुन बहुआयामी व्यक्तिमत्व घडते. म्हणुन सध्याच्या काळात केवळ गुण पत्रिकेवरील गुण महत्वाचे नसुन स्वतःमधिल विविध कौशल्येही तितकीच महत्वाची […]

Read More

भिडे वाड्याच्या संवर्धनासाठी ५० कोटींची तरतूद केल्याबद्दल ओबीसी समाजातर्फे शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन…

कोपरगाव प्रतिनिधी:- थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ब्रिटिश राजवटीत १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या ऐतिहासिक भिडे वाड्याचे जतन करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबद्दल कोपरगाव येथील ओबीसी समाजाच्या वतीने शिंदे-फडणवीस सरकारचे विशेष ठरावाद्वारे […]

Read More

महिला शिक्षणाचा महात्मा फुलेंचा निर्णय समाज परिवर्तनात मैलाचा दगड ठरला:- सौ. पुष्पाताई काळे ;कोपरगावमध्ये महात्मा फुलेंची जयंती उत्साहात साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शिक्षणाचा अभाव असल्यामुळे समाजात रूढी, परंपरा जोपासल्या जावून समाजात अज्ञानाचा अंधार पसरला होता. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार होणे गरजेचे होते. जोपर्यंत महिला शिक्षण घेणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यावेळी स्त्री शिक्षणाचा निर्णय घेतला. त्या निर्णयामुळे आज महिला शिक्षण घेवून स्वावलंबी तर झाल्या आहेत त्याचबरोबर देशाच्या […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेकडूनआयोध्यानगरमध्ये नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु अनेक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी, नागरिकांनी मानले आ. आशुतोष काळेंचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या हद्दवाढीतील अयोध्या नगर व परीसरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे आ. आशुतोष काळे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला तातडीने हि समस्या सोडविण्याची सूचना केली होती. त्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेकडून अयोध्यानगर भागात आजपासून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु करण्यात […]

Read More

नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पिक विम्याचे निकष बदला:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- . पावसाळ्यात पाऊस पडतो अतिवृष्टी होते. मात्र हिवाळा व उन्हाळ्यात देखील पाऊस आणि सोबतीला गारपीट होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा असते. मात्र विमा कंपनीच्या जाचक अटींमुळे पिक विमा भरूनही अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहे. त्यामुळे अशा नैसर्गिक […]

Read More

कर्मवीर काळे कारखान्याच्या मयत सभासदाच्या वारसासआ. आशुतोष काळेंच्या हस्ते सव्वा दोन लाख नुकसान भरपाईचा धनादेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील सभासद साहेबराव देवराम औताडे यांचे मोटार सायकल अपघातात अपघाती निधन झाले होते.त्यांच्या वारसांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते दोन लाख पंचवीस हजाराचा धनादेश नुकताच कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार […]

Read More