
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपरिषदेत झालेल्या तोडफोड व मारहाण प्रकरणामुळे अनेक अधिकारी रजेवर जाताहेत, तर काहींनी दहशतीमुळे बदलीचे प्रयत्न सुरू केले आहेत.कोपरगाव नगरपरिषदेचे कामकाज ठप्प करण्याचा कुटिल डावपेच करणारे राजकारणी कोण? हे जनतेला माहित आहे.काहींनी मंजूर विकासकामे होऊ नयेत यासाठी कोर्ट कचेऱ्या करायच्या व काहींनी दहशत करायची हा फॉर्म्युला वापरून किळसवाणे राजकारण करणारे कोण हे उघड सत्य जनतेला माहित आहे.
काही अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने जनतेला साध्या कामांसाठीही हेलपाटे मारावे लागू शकतात.सामान्य जनतेपेक्षा काही नेत्यांना स्वतःचे पुढारपण महत्वाचे वाटते हेच खरे.पडद्याआड राहून राजकारण कुटिल राजकारण करणाऱ्या नेत्यांनी आपल्याला जनतेने नाकारले म्हणून जनतेचा अशा पद्धतीने बेत पहाणे योग्य नाही.
