Uncategorized

स्वतःची ओळख आणि परिश्रम हाच यशाचा मंत्र :- एन बी धुमाळ…

कोपरगाव प्रतिनिधी :- “प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हायचे असते; परंतु यशाचा खरा मार्ग ओळखणारे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारेच यशाच्या शिखरावर पोहोचतात. यश हे नशिबाने नव्हे तर स्पष्ट ध्येय, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन यांमधून प्राप्त होते. स्वतःची ओळख करून घेत आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्टता साधण्याचा प्रयत्न केला, तर यश निश्चित मिळते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक तथा प्रेरणादायी वक्ते एन. बी. धुमाळ यांनी केले.ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ निमित्त उद्योजकता विकास कक्ष, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता विकास कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी “विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची वृत्ती विकसित होणे ही काळाची गरज असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन केले. तसेच महाविद्यालयातील उद्योजकता विकास कक्ष विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी आणि उद्योगाभिमुख दृष्टीकोन घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल”, असा विश्वास व्यक्त केला.

सदर प्रसंगी डॉ. उज्वला भोर, यांसह कला आणि वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. दिलीप भोये यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा संवत्सरकर व कु. मयुरी देवकर यांनी केले, तर आभार कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *