अविरल गोदावरी येणारा कुंभमेळा आणि ब्रह्मगिरी प्लास्टिक मुक्त व्हावा याविषयी वेणू गोपाल रेड्डी सर (प्रधान सचिव वने) यांच्या दालनात मिटिंग संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :-
चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत अविरल गोदावरी या प्रकल्पासंदर्भात आज वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी यांच्या दालनात अविरल गोदावरी या प्रकल्प संदर्भात बैठक झाली सदर बैठकीत अंतरराष्ट्रीय जल पुरुष डॉ राजेन्द्र सिंह जी,नाशिकहून विभागीय आयुक्त श्री प्रवीण गेडाम सर, जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा,मुख्य वन सरंक्षक ऋषीकेश रंजन, उपवन सरंक्षक पंकज गर्ग, महापालिका आयुक्त श्री अशोक करंजकर सर, जिल्हा परिषद मुख्याधिकारी
हे दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
सदर बैठकीत येणाऱ्या 2027 चा प्लास्टिक मुक्त कुंभमेळा व्हावा गोदावरी नदी मलजल मुक्त व्हावी तथा ती अविरल निर्मल वाहावी आणि संपूर्ण ब्रह्मगिरी प्लास्टिक कचरा मुक्त व्हावा या विषयावर सखोल चर्चा झाली.
रविकिरण गोवेकर,सत्संग फॉउंडेशनच्या वासुकी सुंदरम,नमामि गोदा फॉउंडेशन अध्यक्ष श्री राजेश पंडित, सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर,विजयश्री सेवा संस्थेचे श्री मनोज साठे, गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, अपर्णा कोठावळे,चंद्रकिशोर पाटील, श्रीकांत जोशी आणि अर्चना जोशी हे मुंबईला या बैठकीसाठी उपस्थित होते
जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *