कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कोपरगांव विधानसभा मतदार संघाबरोबरच जिल्हा परिषद व जिल्हा बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष म्हणून अहमदनगर जिल्हयाच्या विकासात मोलाचा सहभाग दिला असल्याचे प्रतिपादन माजी सरपंच व जिल्हा मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष बापूसाहेब सुराळकर यांनी केले.
तालुक्यातील येसगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत होतकरू मुलांना मोफत वहयासह शालेय साहित्याचे वाटप करण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
श्री. बापूसाहेब सुराळकर पुढे म्हणाले की, हारतुरे, शाल, श्रीफळ यातील खर्चातून होतकरू मुलांना शालेय साहित्य वाटप करा हा संदेश बिपीनदादा कोल्हे यांनी तालुक्यात रूजवुन वाढदिवस साजरे करण्याची पध्दती बदलविण्यांत समाजाची मानसिकता बदलविली.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी संपुर्ण ग्राम स्वच्छता अभियानात येसगांव ग्रामपंचायतीची ओळख संपूर्ण भारतात करून राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय पारितोषक मिळवून दिले. सामाजिक उपक्रमांत बिपीनदादा कोल्हे सातत्याने पुढाकार घेवुन काम करत असतात. त्यांच्यानंतर पुढची युवा पिढी देखील त्याच जोमाने कार्यरत आहे. पर्यावरणाचा असमतोल दूर करण्यांसाठी वृक्ष लागवड महत्वाची असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी सर्वश्री. बाळासाहेब निकोले, डॉ मनोज आहेर, भास्कर सुराळकर, सतिष गोसावी, अतुल सुराळकर, किरण गायकवाड, व येसगांव पंचक्रोशीतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


फोटोओळी:- कोपरगांव-
येसगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत होतकरू मुलांना मोफत वहयासह शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
