
कोपरगाव प्रतिनिधी:-
ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार आशुतोषदादा काळे यांच्या नेतृत्वाखालील कोपरगांव विधानसभा मतदारसंघात १६ ग्रामपंचायत मध्ये मिळालेला विजय हा त्यांनी केलेल्या विकास कामांचा विजय असुन जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आहे.
आमदार आशुतोषदादा काळे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्या पासुन सतत विकास कामांचा धडाका लावला आहे तालुक्यातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत, माताबघिनींना व विशेष करून युवकांना आपल्या कामाने प्रभावित केले आहे. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये निधी उपलब्ध करून देतांना दुजाभाव केला नाही. तेथील सर्व महत्त्वाची कामे मार्गी लाऊन गावे प्रगती कडे नेली आहे. कोपरगांव शहराला जोडणारे सर्वच रस्त्यांना निधी मिळवून दिला व दळणवळणाचा प्रश्न मिटला व त्यामुळे व्यापाराला चालना मिळाली, गावातील पाण्याचा प्रश्न मिटवला. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवले त्यांना वेळोवेळी शासनाची मदत मिळवून दिली, मतदारसंघात अकराशे कोटींचा निधी आणुन तालुक्यातील खुंटलेला विकास पुर्व पदावर आणला. त्यामुळेच जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार आशुतोषदादा काळे यांच्यावर विश्वास ठेवून एक प्रकारे त्यांनी केलेल्या विकासकामांची मतदान रूपी परतफेड केलेली आहे.
कोपरगांव तालुक्याचा विकासाचा महामेरू आमदार आशुतोषदादां काळे यांच्या नेतृत्वात या पुढील नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत देखील जनता त्यांना विजयी करेल व कोपरगांव तालुक्यात विकासाची गंगा वहात राहील यात शंका नाही
