जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून मागील पाच वर्षात ग्रामीण भागातील बहुतांशी रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव ते करंजी या दोन गावांना जोडणारा व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा अंचलगाव ते करंजी रस्ता व्हावा अशी या दोनही गावातील अनेक वर्षापासूनची मागणी होती. मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या नागरिकांनी या रस्त्याबाबत मागणी केली होती. या दोनही गावातील नागरिकांना येत असलेल्या रस्त्याच्या अडचणीची दखल घेवून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. अंचलगाव, करंजीप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक रस्त्यांचा अनुशेष भरून काढतांना मागील पाच वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून बहुतांशी रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे २० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या अंचलगाव ते करंजी (ग्रामा१६) रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कारभारी आगवन, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक संजय आगवन, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, सांडूभाई पठाण, चांगदेव आगवन, नारायण आगवण, गणेश गायकवाड, गोरख लांडबिले, राहुल जगधने, सुनील जाधव, भास्कर रहाणे, किशोर चरमळ, बाबासाहेब आगवण, संजय जाधव, ज्ञानदेव आगवण, गोपाल कुलकर्णी, नवनाथ आगवण, कारभारी भिंगारे, शिवाजी जाधव, चंद्रकांत भिंगारे, गोरख भिंगारे, संजय उगले, देवीदास भिंगारे, दत्तात्रय बोठे, नानासाहेब भिंगारे, एकनाथ लांडबिले, तुळशीदास मलिक, वसंत आरखडे, मच्छिन्द्र भिंगारे, छबुराव आहेर, सुनील आगवण, शिवाजी फोफळे, नारायण भाटी, सचिन देशमुख, बाळासाहेब कोल्हे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, शाखा अभियंता लाटे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ:- येणाऱ्या अंचलगाव ते करंजी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी आ. आशुतोष काळे व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *