पुणतांबे प्रतिनिधी:–
तंटा मुक्त समीतीच्या माध्यमातुन काही तंटे गावतले गावात मिटले जात असल्याने, तंटा मुक्त समीतीकडे तंटे मिटविन्यासाठी ग्रामस्थांचा कल वाढला आहे. या कामासाठी महीन्यातुन तिन वेळा समीतिच्या बैठका सुरु झाल्या आहेत. आज जमिन, बांध. विहीर हीस्सा, अतिक्रमन. असे पाच तंटे समीतीच्या बैठकिपुढे होते. त्यांपैकी चार तंट्यात सामंजसपने मार्ग काढन्यास यश आल्याची माहीती तंटा मुक्त समीती अध्यक्ष सुहास वहाडणे यांनी दिली.
पुणतांबे गाव मोठे असुनही गावातले तंटे गावातच मिटवले जात आहे. भांडने कोर्टापर्यत जाऊ नये यासाठी सरपंच डाँ धनंजय धनवटे. तंटामुक्ती समीती अध्यक्ष सुहास वहाडणे. माजी सरपंच मुरलीधर थोरात, बाळासाहेब चव्हाण. प्रयज्ञशिल असतात.
आज ग्रामपंचायत सभागृहात तंटामुक्त समीतीची बैठक पार पडली. विहीर हीस्सा, बांधाचे वाद. शेजारच्याला शेतात जाण्यासाठी रस्ते न देणे. स्वमालकीच्या जागेवर अतिक्रमन करने. आदी विषयाबाबतचे तंटे सभेपुढे आले होते. समीती सदस्यांनी दोन्ही बाजुच्या तक्रारदारांचे म्हनने एकुन घेतले. वाद विकोपाला जावुन कोर्टाची पायरी चढु नका. असा सल्ला दिला. अखेर तडजोडीने वाद संपुष्टात आल्याचे संकेत मिळताच लेखी कागद तयार झाला. कामगार तलाठी या समीतीचे सचिव आहेत. त्यामुळे महसुली नोंदीबाबत वाद मिटल्यावर अडचन येत नाही.
तंटा मुक्त समीती योग्य मार्ग दाखवत असल्याने, वाद मीटवन्यासाठी अनेकांचा ओढा समीतीकडे लागला आहे. त्यामुळे समीतीचे काम वाढले आहे. समीती कारभारावर अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. भाऊसाहेब केरे. तलाठी कार्यालयीन प्रतिनीधी. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी कुमार हासे. पत्रकार प्रतिनीधी ऊपस्थीत होते.

फोटो ओळी:- तंटा मुक्त समीतीच्या बैठकिला जमलेले तंटाग्रस्थ ग्रामस्थ.
