२०२४ पर्यंत निळवंडे धरणातून टेल टू हेड पाणी देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- चांदेकसारे गटातील जिरायती भागासाठी जिव्हाळ्याच्या असलेला निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महाविकास आघाडी सरकारने निळवंडे कालव्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे निळवंडेच्या कामाला वेग आला आहे.२०२४ पर्यंत निळवंडेचे पाणी कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील अकरा गावात टेल टू हेड पोहोचविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे जिरायती भागातील गावांचा पिण्याच्या व शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे गावठाण चौक ते दशक्रिया विधी घाट रस्त्याचे खडीकरण करणे तसेच अंजनापूर येथे गावठाण ते प्रभात डेअरी रस्ता डांबरीकरण करणे, नानासाहेब गव्हाणे घर ते ज्ञानदेव गव्हाणे घर रस्ता डांबरीकरण करणे व अंजनापूर ते बहादरपूर शिवरस्ता खडीकरण करणे आदी विकासकामांचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणी असतांना सुद्धा आजपर्यंत ६६६ कोटी निधी दिला आहे.भू संपादनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देवून निळवंडे कालव्याच्या अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे २०२४ पर्यत जिरायती भागातील अकरा गावात टेल टू हेड पाणी पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच सर्व खराब रस्त्यांसाठी निधी देवून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली. यावेळी भाजपाचे कोल्हे गटाचे विजय कोटकर, रामनाथ गव्हाणे, राहुल गव्हाणे,पुंजाहारी गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी स्वागत केले.

पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सुनील शिंदे, राहुल रोहमारे, योगेश खालकर, केशव जावळे, बाबुराव थोरात, लक्ष्मण थोरात, युवराज गांगवे, किसनराव पाडेकर, देवेन रोहमारे, नरहरी रोहमारे, बाळासाहेब रहाणे, कौसर सय्यद, सिकंदर इनामदार, सुधीर पाचोरे, राजेंद्र पाचोरे, उत्तमराव कुऱ्हाडे, राहुल जगधने, नंदकिशोर औताडे, योगेश औताडे, बाळासाहेब औताडे, उपसरपंच गोपीनाथ रहाणे, आप्पासाहेब पाडेकर, कैलास गव्हाणे, बळीराम गव्हाणे, भास्करराव गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, ज्ञानेश्वरजी गव्हाणे, ज्ञानेश्वरजी गव्हाणे, पोपटराव गव्हाणे, आकाश गव्हाणे, पर्वत गव्हाणे, सरपंच कविताताई गव्हाणे, बाळासाहेब रहाणे, काकासाहेब रहाणे, साईनाथ महाराज रहाणे, भाऊसाहेब रहाणे, रामनाथ पाडेकर, साहेबराव रहाणे, सोमनाथ रहाणे, वामनराव रहाणे, शिवाजीराव रहाणे, निवृत्ती गव्हाणे, तुळशीराम गव्हाणे, बाळासाहेब गव्हाणे, तुकाराम गव्हाणे, बाबुराव गव्हाणे,दत्तात्रय रहाणे, जगन्नाथ पाडेकर, नानासाहेब रहाणे, दशरथ पाडेकर, नानासाहेब पाडेकर, आबासाहेब रहाणे, पाराजी रहाणे, अण्णासाहेब रहाणे, विलास रहाणे, नंदू पाडेकर, नानासाहेब रहाणे, रामनाथ रहाणे, जगन बोरसे विवेक गव्हाणे, विजय गव्हाणे, संतोष गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, संतोष वर्पे, आदी मान्यवरांसह बहादरपूर व अंजनापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *