
कोपरगाव प्रतिनिधी:- कर्मवीरनगर व दुल्हनबाई वस्ती परिसरात पावसाचे पाणी घरात जाऊन या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. तरी ह्या पावसाच्या पाण्याचे कायमस्वरूपी नियोजन लावावे यासाठी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुख्याधिकारी श्री. शांतारामजी गोसावी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भावेशजी थोरात, धनंजयजी कहार, आकाशजी डागा, तेजसजी साबळे, अक्षयजी आंग्रे, वाकचौरे सर, शिंदे सर, माकुणे सर, निरंजनजी कुंडेकर, लताताई वाकचौरे, सुनंदाताई माकूने, सुनीताताई थोरात, अलकाताई थोरात, लीनाताई सोनवणे, लालमणीताई विश्वकर्मा, ममताताई निकम, सुवर्णाटाऊ डांगे, अनिताताई क्षीरसागर, यमुनाताई शिंदे, विजयाताई सोनवणे, सौ. धापटकर आदी उपस्थित होते.
