कोल्हे गटातील नगराध्यक्ष पदासह 21 जागांसाठी उमेदवार जाहीर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी ;पराग संधान यांची नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोल्हे गटाने नगराध्यक्ष पदासह 21 नगरसेवक जागांसाठीचे उमेदवार जाहीर करताच शहरात निवडणुकीच्या उत्साहाला उधाण आले आहे. भारतीय जनता पार्टी, आरपीआय व मित्रपक्ष लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने हा उमेदवार जाहीर सोहळा कलश मंगल कार्यालयात पार पडला. या प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या समारंभास मा. आ.स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते […]

Read More

कर्मवीर कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडेल:- आ.आशुतोष काळे…

‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५’ ची उत्साहात सांगता…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सार्थकी लावलं. त्यांच्या विचारांच्या वाटेवर वाटचाल करीत असतांना अस्मानी संकटामुळे बेभरवशाचा झालेला शेती व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होवून त्यांची आर्थिक भरभराट व्हावी या उद्देशातून आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘कर्मवीर कृषी महोत्सव […]

Read More

दुधाळ जनावरे मोजकीच पाळा आणि त्यांची योग्य काळजी घ्या तरच दुग्ध व्यवसाय फायदेशीर राहील :- पशुसंवर्धन तज्ञ डॉ.शैलेश मदने…

कर्मवीर कृषी महोत्सव महोत्सवात दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले मोलाचे मार्गदर्शन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दूध उत्पादनात नफा मिळवण्यासाठी फक्त अधिक उत्पादन नव्हे तर किफायतशीर उत्पादन महत्त्वाचे आहे. जनावरांचे आरोग्य, संतुलित पोषण, स्थानिक खाद्य-साधनांचा वापर, वेळेवर प्रजनन व्यवस्थापन आणि आजार नियंत्रण या बाबींकडे विशेष लक्ष दिल्यास निश्चितपणे खर्च कमी होऊन दुध उत्पादन वाढवता येते. दुधाळ जनावरांची संख्या […]

Read More

टाकळी फाटा परिसरात पुन्हा बिबट्याचा हल्ला,नागरिक संतप्त, स्नेहलताताई कोल्हे यांची तातडीची मागणी नरभक्षक बिबट्या ठार करा…

कोपरगाव प्रतिनिधी:-टाकळी फाटा परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात महिलेला जीव गमवावा लागला असून संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. नुकताच साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच घडलेली ही दुर्दैवी घटना अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेनंतर नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी नगर–मनमाड महामार्ग ठिय्या आंदोलन करून बंद पाडला आहे. […]

Read More

येसगावात बिबट्याच्या हल्ल्यात महिला मृत्यूमुखीनरभक्षक बिबट्याला ठार मारा घटनास्थळावरूनआ.आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री अजितदादांकडे मागणी…

घटनेची माहीती समजताच वीसच मिनिटात आ.आशुतोष काळे घटनास्थळी हजर…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील आठवड्यात टाकळी परीसरात ऊस तोडणी मजुराच्या चार वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला होता. हि घटना ताजी असतांनाच सोमवार (दि.१०) रोजी सकाळी ११.००वा.सुमारास शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अंदाजे ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला […]

Read More

२८ विकास कामांना विरोध करणारे तुम्हीचठेकेदार तुमचे, भ्रष्टाचार करणारे तुम्हीच – जनताच तुम्हाला धडा शिकवेल ;आ. आशुतोष काळेंवर केलेले आरोप म्हणजे सूर्यावर थुकणे :- सुनील गंगुले…

विवेक कोल्हेंच्या टीकेला राष्ट्रवादीकडून चोख प्रतिउत्तर…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ज्या जनतेने तुम्हाला विकास कामे करण्यासाठी निवडून दिले त्याच जनतेला अपेक्षित असलेली विकास कामे होवू नये म्हणून तुम्ही विकासकामांना स्थगिती मिळावी यासाठी न्यायालयात गेले. आ.आशुतोष काळे यांनी हि स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न सुरु करताच तुम्ही शेपूट घालून माघार घेतली. तुम्ही विकासावर बोलून आ.आशुतोष काळेंवर टीका करने म्हणजे […]

Read More

ऊस रोपाच्या माध्यमातून केलेली ऊस लागवड शेतकऱ्यांना वरदान :- डॉ.अंकुश चोरमुले…

कर्मवीर कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आधुनिक शेतीत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्नात वाढ करणे हि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळाची गरज बनली आहे. त्यामुळे ऊस लागवडीसाठी ‘ऊस रोप पद्धती’ ही आधुनिक आणि फायदेशीर तंत्रज्ञानाधारित पद्धत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध […]

Read More

आ. आशुतोष काळे जनतेविषयी अत्यंतप्रेम व जिव्हाळा असलेला लोकप्रतिनिधी :- कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- माझ्या कॉलेज जीवनापासून मला अहिल्यानगर जिल्ह्याबद्दल एक वेगळेच आकर्षण असून या जिल्ह्याचे वैशिष्ठ म्हणजे या जिल्ह्यातील मुलांमध्ये जेवढा विनम्रपणा आहे तेवढा विनम्रपणा कुठेही नाही. केंद्र शासनाच्या तसेच राज्याच्या योजना मतदार संघाला मिळाल्या पाहिजे. त्याचा लाभ सर्वसामान्य, गोरगरीब माणसाला झाला पाहिजे. मागासवर्गीय असेल, अल्पसंख्यांक असेल अशा प्रत्येक समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ […]

Read More

दुग्धव्यवसाय वाचविण्यासाठी शासनानेदुधाला पूर्ववत अनुदान सुरु करावे – परजणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारी तत्वावरील दूध संघांकडे दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांच्या दुधाचा दर गेल्या काही महिन्यांपासून ३६ ते ३७ रुपयांवर गेलेला आहे. त्याप्रमाणात सहकारी दूध संघांकडून बाजारपेठेत विक्री होत असलेल्या पॅकींग दुधाचे दर मात्र वाढलेले नाहीत. खरेदी आणि विक्रीच्या दरामध्ये मोठी तफावत निर्माण झालेली आहे. भविष्यात दुग्धव्यवसाय संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली असून हा व्यवसाय वाचविण्यासाठी […]

Read More

बिबट्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचविण्यासाठीत्याला ठार मारण्याची परवानगी मिळावी – परजणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-अलिकडच्या काही महिन्यांपासून मानवी वस्तीमध्ये भक्ष्यांच्या शोधार्थ बिबट्यांचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून पाळीव प्राण्यांसह माणसांवरील हल्ल्याचे प्रमाण देखील वाढले आहेत. अशा घटनेत अनेक पाळीव प्राणी, लहान बालके व माणसांना जीव गमवावा लागत आहे. अशा हत्त्यातून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी शासनाने बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील […]

Read More