१.५० कोटी निधीतून श्री राघवेश्वर महादेव मंदिराचेविविध विकासकामे सुरु: – आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव तालुक्यातील पौराणिक व ऐतिहासिक असलेल्या तसेच कुंभारी व पंचक्रोशीतील भाविकांचे अखंड श्रद्धास्थान असलेल्या श्री राघवेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी महायुती शासनाकडून पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, राज्य संरक्षित स्मारक जतन दुरुस्ती अंतर्गत मिळालेल्या दीड कोटी रुपयांच्या विकास कामे सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे शिवभक्तांच्या सोयी सुविधेत वाढ होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली. […]

Read More

पराभव समोर दिसत असल्यामुळे विरोधक पातळी सोडून टीका करत आहे:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- समता पतसंस्था व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे राजकारण विरहित समाजाची कामे करत आहेत.ते त्यांच्या कामाबद्दल समाजात लोकप्रिय आहेत त्यामुळे मी आणलेल्या निधीतून कोपरगाव शहराचा जास्तीत जास्त विकास करता यावा यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी मी काका कोयटे यांना आग्रह करून त्यांना उमेदवारी दिली आहे. तेव्हापासून कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणूकीत विरोधकांना पराभव समोर […]

Read More

कोपरगावला कायमस्वरूपी वनपरिक्षेत्र अधिकारी यांची नेमणूक:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर-राज्यासह कोपरगाव मतदार संघात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण होवून दोन निरपराध बळी गेले आहे.त्या पार्श्वभूमीवर बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यांपासून नागरीकांच्या व पाळीव जनावरांच्या संरक्षणासाठी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे स्वतंत्र व पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल […]

Read More

कोयटे यांच्या दुटप्पी भूमिकांवर रणशूर – गंगवाल यांचा घणाघात ; कोयटे- पिता पुत्रांनी जनतेची जाहीर माफी मागावी…

कोपरगाव प्रतिनिधीदिवंगत शंकरराव कोल्हे साहेब व दिवंगत शंकरराव काळे साहेब या दोन्ही कर्तव्यनिष्ठ नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत असे म्हणण्याचा अथवा आरोप करण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही, असे सांगत या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून संदीप कोयटे यांनी केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी संतोष गंगवाल यांनी केली. आपण जर पंचवीस वर्षे या […]

Read More

पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणार :- आ.आशुतोष काळे…

बाबा पीर रतन नाथ मंदिर तोडफोड कोपरगावात पंजाबी हिंदू व शीख बांधवांकडून निषेध मोर्चा…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगावात शीख समाजाच्या वतीने दिल्ली येथे महानगरपालिकेने झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतन नाथ मंदिरांची तोडफोड केली. त्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात आ.आशुतोष काळे यांनी सहभागी होवून दिल्ली महानगरपालिकेच्या अन्यायकारक कृत्याचा निषेध करून शीख समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणार असल्याची त्यांनी […]

Read More

कोपरगावात वाढत्या अवैध धंद्याकडे आ.आशुतोष काळेंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीसांचे वेधले लक्ष…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर -कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरात वाढलेल्या अवैध धंद्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे लक्ष वेधून अवैध धंदे रोखण्यासाठी त्यांना सविस्तर निवेदन दिले आहे. कोपरगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे अवैध धंदे खुले […]

Read More

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूल विजेता , गौतमच्या चार खेळाडूंची महाराष्ट्राच्या हॉकी संघात निवड…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ ते ७ रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघ या स्पर्धेचा विजेता संघ ठरला असून गौतम पब्लिक स्कूलच्या प्रणव लोंढे (गोलकीपर), […]

Read More

के. बी. रोहमारे पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-“”महाराष्ट्राच्या राजकीय चारित्र्याचा, नैतिकतेचा व मूल्यांचा इतिहास जर कुणाला लिहावासा वाटला तर त्या पुस्तकातील खूप जागा के.बी. रोहमारेंचे व्यक्तिमत्व घेईल. आजच्या राजकारणातील नागवेपण संपवायचे असेल तर केबीं सारख्या तत्त्वनिष्ठ राजकारण्यांची गरज आहे. के.बी. साहेबांनी कृष्णाकाठा प्रमाणे गोदाकाठी क्रांती आणली. नगर जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि गोदामाई प्रतिष्ठानचे गोदावरी स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न…

निवडणूक निकालापूर्वीच विश्वासनामा सत्यात उतरविण्याचे पहिले पाऊल :- विवेकभैय्या कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:-रविवारी सकाळी गोदामाई प्रतिष्ठान आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी युवानेते विवेकभैय्या कोल्हे,गोदावरी नदी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे,भाजपा मित्रपक्षांचे उमेदवार पराग संधान व विविध प्रभागातील उमेदवार यासह मोठ्या संख्येने युवासेवक आणि गोदासेवक उपस्थित होते. कोपरगाव शहर आणि तालुक्याला […]

Read More

महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे लोकशाही व न्यायाचा अधिकार मिळाला :- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-ज्ञानाचे महासूर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगावात अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कार्यकर्त्यांसह वंदन करून महामानवांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले. वंदनीय महामानव डॉ.बाबासाहेब […]

Read More