कोरडवाहू शेतकऱ्याने घेतले एकरी १२ क्विंटल सोयाबीन, गव्हाचं उत्पन्न…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत मिळालेल्या विहिरीमुळे जगण्याचं बळ…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- -डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राहाता तालुक्यातील चितळी येथील अर्जुन सुभाष पगारे यांच्यासाठी जगण्याचं बळ देणारी ठरली आहे. एकेकाळी कोरडवाहू शेतीमुळे हालअपेष्टांचे जीवन जगणारे अर्जुन पगारे या योजनेतून मिळालेल्या विहिरीच्या पाण्याच्या माध्यमातून एकरी १२ क्विंटल सोयाबीन व गव्हाचं उत्पन्न घेत स्वावलंबनाने जीवन जगत आहेत.महाराष्ट्र शासनाच्यावतीने […]

Read More

संतोष पारासुर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी तालुका कोपरगाव येथील प्राथमिक शिक्षक श्री. संतोष नवनाथ पारासुर यांना ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान ता.श्रीरामपूर यांच्या वतीने त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.मा.श्री लहुजी कानडे , मा.श्री.रोहित वाकचौरे,मा.श्री सागरजी वैद्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य मा.श्री.प्रभाकर तावरे मा. डॉ. वंदनाताई मुरकुटे […]

Read More

हृदयविकार टाळण्यासाठी जीवन शैलीत बदलावा:- डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी…

कुंभारी येथील राघवेश्वर मंदिरात विक्रमी ४०२ नागरिकांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ…कोपरगाव प्रतिनिधी :-आत्ताची बदलती जीवन शैली व नियमित व्यायाम, चांगली झोप, योग्य आहार, व्यसनापासून दूर राहणे, योग, प्राणायाम, नियमित आरोग्य तपासणी, तणाव मुक्त जीवन अंगीकार करण्याची गरज आहे. त्याचे प्रत्येकाने जीवन शैलीत बदल करून आपले आयुष्यमान वाढवावे. असे प्रतिपादन नाशिक येथील हृदय रोग तज्ञ डॉ.अनिरुद्ध […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालय येथे रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश काळे यांची सेवापूर्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:-“आमच्या सोमैया महाविद्यालयामध्ये गेल्या 50-60 वर्षांमध्ये प्रा.ना.स.फरांदे, डॉ. गुळगुळे, प्रा. घैसास आदी अनेक विद्वान आणि नामवंत प्राध्यापक होऊन गेलेत, ज्यांच्यामुळे महाविद्यालयाचा नावलौकिक झाला. विज्ञान शाखेचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश काळे याच परंपरेतील एक अभ्यासू आणि कष्टाळू प्राध्यापक होत. त्यांच्या रूपाने विज्ञान शाखेचा पहिला प्राध्यापक आज निवृत्त होत आहे. आज नावारूपास आलेली विज्ञान शाखा […]

Read More

योगदान शून्य आमदार काळे यांच्याकडे दूरदृष्टी नाही:- सुरेश जाधव…

कोपरगाव प्रतिनिधी:-ज्यांना गावात कुणी विचारत नाही स्वतःच्या गावाने ही अनेकदा नाकारले आहे अशांनी आमच्या नेत्यांवर पूर्ण माहिती नसताना बोलणे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाल्यासारखे आहे. कोल्हे कुटुंब हे समाजसेवेचा आणि गोरगरिबांना रोजगाराचा वसा घेऊन पुढे जाते आहे. या तुलनेत काळे कुटुंबाने तालुक्यात रोजगारासाठी काहीही ठोस काम केले नाही हे सर्वांना ठाऊक आहे. स्वतः काही करायचे […]

Read More

अवैध धंदे बंद होण्यासाठी कोल्हे गटाचे २ ऑक्टोबरला आमरण उपोषण…

राजकीय मांडवल्या करणारा तो सचिन कोण ? कॉल डिटेल्स काढण्याची मागणी…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात गोळीबार घटना झाल्याने नागरिक धास्तावले आहेत.त्यात गोळी लागलेली व्यक्तीला रुग्णवाहिकेतून नेत असताना त्याने लोकप्रतिनिधी आणि त्यांचे स्विय सहाय्यक यांचे नावे घेतलेला व्हिडिओ सर्वप्रथम प्रसिद्ध केला.धक्कादायक नावे घेतले आहे.त्यांच्यावर अद्यापही काहीही कारवाई झालेली दिसत नाही.तसेच वाढती गुन्हेगारी ही अवैध व्यवसायामुळे फोफावते आहे.नागरिक,व्यापारी,महिला,लहान मुले […]

Read More

ज्यांना कावीळ झाली आहे त्यांना सगळंच पिवळं दिसते आ. आशुतोष काळेंची कोल्हेंवर नाव न घेता खोचक टीका…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मराठी भाषेत एक म्हण आहे, ज्यांना कावीळ झाली आहे त्यांना सगळंच पिवळं दिसते अशीच काहीशी परिस्थिती ज्यांना विकास दिसत नाही त्या विरोधकांची झाली आहे अशी खोचक टीका आ.आशुतोष काळे यांनी पारंपारिक विरोधक कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.कोपरगाव तहसील कार्यालयात संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठक […]

Read More

कोपरगाव मतदार संघाची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होणार,,पोहेगावला ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयास मान्यता:-आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील पोहेगाव परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध होण्यासाठी पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन होवून ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने पोहेगावला ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयास मान्यता दिली आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघाची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होणार असल्याची माहिती […]

Read More

कापूस, सोयाबीन अनुदानापोटी १५.६२ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महायुती शासनाने २०२३ च्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेतलं होत त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर १५.६२ कोटीच्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.२०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन व कापसाला […]

Read More

दिवाळीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना ओवाळणी तिसऱ्या महिन्याचे दीड हजार खात्यावर जमा होण्यास सुरुवात:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – महायुती शासनाने राज्यातील माता-भगिनींसाठी सुरु केलेली ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेचे तिसऱ्या महिन्याचे दीड हजार रुपये तर ज्या माता भगिनींच्या काही कागदपत्रांची किंवा केवायसी अपुर्तता असल्यामुळे आजपर्यंत एकही महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यावर साडे चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून महायुती शासनाने दिवाळीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी […]

Read More