एस. एस. जी. एम . कॉलेजच्या प्राचार्य पदी:- डॉ. माधव सरोदे…

कोपरगाव प्रतिनिधी :-रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव प्राचार्य पदी डॉ. माधव तुकाराम सरोदे यांची नियुक्ती झालेली आहे. डॉ. सरोदे हे रयत शिक्षण संस्थेत १९९० पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातून त्यांनी ३४ वर्ष अध्यापनाचे काम केले आहे. ते एम. एस्सी. पीएच.डी […]

Read More

शिक्षण थांबवु नका:- डॉ. इम्राण खान,संजीवनी फार्मसी महाविद्यालयात नवगतांचे स्वागत आणि मार्गदर्शन…

कोपरगांव प्रतिनिधी: आजची पिढी ही भारताचे भविष्य आहे. जीवनात संघर्ष असतो, परंतु जिध्द असल्यास यशाकडे जाता येते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात. मात्र सतत शिकत रहा, फार्मसी क्षेत्रात भरपुर संधी आहेत, असे प्रतिपादन टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीचे डिलिव्हरी हेड डॉ. इम्राण खान यांनी केले.संजीवनी फार्मसी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बी. फार्मसी व एम.फार्मसीच्या […]

Read More

जमिनीची धूप थांबविलीतरच भविष्यात शाश्वत उत्पादन मिळेल:-कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-जमिनीतील मातीची धूप कमी करणे, पाणी व्यवस्थापन करणे या सारखे उपाय योजून जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी लक्ष दिले तरच भविष्यात जमीन शाश्वत उत्पन्न देईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.महात्मा फुले कृषि विद्यापीठातील काटेकोर शेतीसाठी डिजीटल तंत्रज्ञानावर आधारीत सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत मृदेची धुप, पोषकता व मृदा संवर्धन […]

Read More

जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक संपन्न…

समन्वयाने आणि प्रभावीपणे वाहनांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांचे आवाहन…कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर ):- जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमधील पोलीस, उत्पादन शुल्क आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि प्रभावीपणे वाहनांची तपासणी करून अवैध मद्य, पैसे किंवा प्रलोभनासाठी उपयोगात येणाऱ्या भेटवस्तूंच्या वाहतूकीला प्रतिबंध करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत […]

Read More

मोबाईल सेवा देणाऱ्यांनी एकत्रित लघूसंदेशाची माहिती निवडणूक यंत्रणेला द्यावी:- जिल्हाधिकारी…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत राजकीय प्रचारासाठी पाठविण्यात येणाऱ्या एकत्रित लघूसंदेशाची (बल्क एसएमएस) माहिती मोबाईल सेवा देणाऱ्यांनी निवडणूक यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. बैठकीस उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील, […]

Read More

आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी:- निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके…

आचारसंहिता भरारी पथकांच्या आढावा…कोपरगाव प्रतिनिधी- भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकाने सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी आज दिले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आचारसंहिता भरारी पथकांच्या […]

Read More

मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यकनाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत:- मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे, ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही त्यांना अजूनही दि. १९ ऑक्टोबर […]

Read More

शासकीय कार्यालय परिसरात निवडणूक प्रचारास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर ): – भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निवडणूक कालावधीत शासकीय कार्यालयांच्या परिसरात निवडणूक प्रचार करण्यास बंदी असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी […]

Read More

निवडणूक काळात खाजगी वाहनांवर पूर्वपरवानगीशिवाय पक्षाचे बोधचिन्ह लावण्यास निर्बंध…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):-भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निवडणूक कालावधीत खाजगी वाहनावर सक्षम प्राधिकारणाच्या पूर्वपरवानगीशिवाय पक्षाचे बोधचिन्ह लावण्यास निर्बंधाचे आदेश निर्गमित केले आहेत.जिल्ह्यात सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगी शिवाय ऑटोरिक्षा, टेम्पो, मोटार सायकल व इतर खाजगी वाहनांवर पक्षाचे बोधचिन्ह, झेंडे व इतर घोषवाक्य लिहीणे इत्यादींवर या आदेशान्वये निर्बंध […]

Read More

मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईल वापरास बंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निवडणूक कालावधीत मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. जिल्ह्यात मतदान होणार असल्याच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारण्यास बंदी राहील. […]

Read More