मायभूमी फाउंडेशनकडून पर्यावरण दिनाचे औचित्य साधत ३१ वटवृक्षांची सामूहिक लागवड ;चासनळी परिसरात पर्यावरण रक्षणासाठी नवा उपक्रम, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग…

कोपरगाव प्रतिनिधी(धामोरी) :- परिसरातील चासनळी येथील निस्वार्थ सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मायभूमी सोशल फाउंडेशनच्या वतीने यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येत गावाच्या हृदयस्थानी ३१ वटवृक्षांची लागवड करत पर्यावरण रक्षणाचा नवा आदर्श घालून दिला.स्वच्छता, मंदिर परिसर आणि नदी साफसफाईसारख्या उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असलेल्या या संस्थेने यावर्षी फक्त […]

Read More

शेतकर्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषि साहित्याचे वाटप उपक्रम महत्वाचा:- विभाग प्रमुख डॉ. सुनील कदम…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शेतकरी समुदायाला शेतीसाठी आवश्यक असणारी छोटी यंत्रे व अवजारे त्यामुळे त्यांचे कष्ट कमी होऊन, उत्पादकता वाढून शेती करण्याच्या शाश्वत पध्दतींना प्रोत्साहन मिळते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख तथा स्मार्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील कदम यांनी केले.महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल […]

Read More

अळिंबीचा आहारामध्ये सुपरफुड म्हणून समावेश करणे गरजेचे:- सहाय्यक महासंचालक डॉ. सुधाकर पांडे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-अन्नधान्य उत्पादनात भारताचे वर्चस्व आहे. यामध्ये पौष्टिक अन्न सुरक्षा ही महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने अळिंबीचे पौष्टिक मूल्य, औषधी गुणधर्म तसेच अळिंबी उत्पादनास लागणारे कमी पाणी, अल्प खर्चिक प्रक्रिया व मूल्यवर्धन तंत्रज्ञानाचा विचार करता अळिंबी उत्पादनास प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी अळिंबीचा आपल्या आहारामध्ये सुपरफुड म्हणून समावेश होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या दूरदृष्टीतून पश्चिम भागहीरस्त्याच्या बाबतीत कायमस्वरूपी होणार समृद्ध:- सचिन चांदगुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आ.आशुतोष काळे यांनी रस्ते व पुलांच्या कामांसाठी मतदार संघातील रस्त्यांसाठी पहिल्याच पंचवार्षिकमध्ये जवळपास सातशे कोटीपेक्षा जास्त निधी आणल्यामुळे बहुतांश रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर तर झालाच परंतु त्याचबरोबर दळणवळणाला देखील मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अशातच अजून एका महत्वाच्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे मतदार संघातील इतर […]

Read More

व्यापारी महासंघाच्या वतीने कोपरगाव रेल्वे स्थानकावर लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या थांब्याची मागणी; व्यापारी, साई भक्त, शेतकरी, विद्यार्थी आणि स्थानिक प्रवाशांची होतेय मोठी गैरसोय…

कोपरगाव प्रतिनिधी:- शिर्डीच्या साईनाथांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची, तसेच कोपरगाव व परिसरातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि सामान्य नागरिकांची रेल्वे प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर कोपरगाव रेल्वे स्थानकावर अवलंबून असलेली सोय, सध्या काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे नसल्यामुळे खंडित झाली आहे. परिणामी, नागरिकांना मनमाड, बेलापूर किंवा पुणे यासारख्या इतर स्थानकांवर प्रवासासाठी जावे लागत आहे. ही गैरसोय लक्षात […]

Read More

आत्मा मालिक संस्था प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित…

कोपरगाव प्रतिनिधीकोकमठाण :- कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक या संस्थेच्या वतीने अध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेञात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आत्मा मालिक ध्यानपिठ कोकमठाण या संस्थेस नुकताच राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. अध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेञात काम करणा­या संंस्थासाठी हा पुरस्कार मानाचा व विशेष सन्मानाचा मानला जातो. हा पुरस्कार धर्मदाय सहआयुक्त म.ला. […]

Read More

आंतरराष्ट्रीय फिशरी टेक एक्स्पो २०२५’ मत्स्य व्यवसायाच्या नव्या युगाची सुरुवात…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई, गोरेगाव):-नेस्को केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय फिशरी टेक एक्स्पो २०२५’ (IFT EXPO 2025) या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री मा.ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून इफको नवी दिल्लीचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेतील मत्स्यपालनाचे महत्त्व अधोरेखित […]

Read More

गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांनापिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचे देखील आवर्तन:- कारभारी आगवण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षी पावसाळ्यात समाधानकारक पर्जन्यमान झाल्यामुळे चालू वर्षी सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली होती. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केलेली मागणी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील ह्यांनी मान्य केली होती. त्या मागणीनुसार सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तना बरोबरच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंचनाचे देखील आवर्तन होणार असल्याची माहिती […]

Read More

गोदावरी कालव्यांना उन्हाळ हंगामाचे आणखी एक पाणी आर्वतन तात्काळ सोडावे – बिपीनदादा कोल्हे यांची नाशिक पाटबंधारे विभागाकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-सध्या दारणा व गंगापूर धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामासाठी आणखी एक पाण्याचे आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे, अशी ठाम मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाकडे केली आहे.बिपीनदादा कोल्हे यांनी यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, उन्हाळ हंगाम १ मार्च ते ३० जून या […]

Read More

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल, सप्तर्षी मळा शाखा व जेऊर पाटोदा शाखा,कोपरगाव येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात आणि उत्सवमूढ वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेच्या पूजन करून वृक्षारोपणाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थांचे संस्थापक माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,विश्वस्त विशाल झावरे,मुख्याध्यापक सचिन मोरे, स्थानिक नागरिक,पालक,विद्यार्थी,शिक्षक व […]

Read More