शिवसेनेकडून महिलांना समाजकारण व राजकारणात मोठी संधी:- विमल पुंडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी: महाराष्ट्रात आणि देशातही महायुतीचे शासन सर्व आघाड्यावर उत्तम काम करत आहे. महायुतीचे शासन काळात संरक्षण, अर्थ, व्यापार, शिक्षण, कृषी ,विज्ञान आदी सर्व क्षेत्रात आपण विकास साधत आहोत.
आपली अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे.
संरक्षण क्षेत्रात आपण घेतलेल्या आघाडीचा प्रत्यय आपण नुकताच जगाला दाखवून दिला आहे. आपलं महाराष्ट्र राज्य देशात आता पुन्हा सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य बनले आहे. महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या जात आहेत.
महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर राष्ट्रवादी विचारावर चालणाऱ्या पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत महिलांना समाजकारण व राजकारणात मोठी संधी आहे.
शिवसेना नेत्या निलम ताई गोरे, व मीनाताई कांबळी, शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांचे महिलांना देव देश धर्मासाठीचे सतत मार्गदर्शन असते. भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत समाजासाठी लढणाऱ्या शिवसेनेला साथ देण्याचा महाराष्ट्रातील जनतेचा कल आहे. घराणे शाहीला थारा नसलेल्या शिवसेनेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठी संधी मिळते हा इतिहास आहे.
महिलांना असणाऱ्या आरक्षणामुळे महिलांना समाजकारणात मोठा वाव आहे. समाजकारणाची आवड असणाऱ्या चांगल्या प्रतिमेच्या महिलांनी शिवसेना महिला आघाडीत सक्रिय व्हावे असे आवाहन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *