
कोपरगांव प्रतिनिधी:-
जगात भारत देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात जी कामगिरी केली त्याला तोड नाही, तेंव्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच रहावे ही सर्वसामान्यांची इच्छा असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस रविवारी सेवादिन म्हणून साजरा करण्यांत आला त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रारंभी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात व तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी पक्षाच्यावतीने मतदारसंघात राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन विकास कार्याचा लेखाजोखा सांगितला., शहराध्यक्ष दत्ता काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम विक्रम पाचोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांची अंमलबजावणी केंद्रीय मंत्रिमंडळ तसेच राज्य मंत्रिमंडळाने तंतोतंत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगितले.
सौ. स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः पेक्षा समाजासाठी जगले, त्यातून त्यांनी दीन-दलित, गोर-गरीब, वंचित, अल्पसंख्याक आदिचे प्रश्न- अडचणी समजुन घेत त्यावर मार्ग काढला, कोरोना महामारीच्या काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवठा करून सांभाळले त्यामुळे या कणखर नेतृत्वाला आपल्यासह सर्वांचे आयुष्य लाभावे अशी साईचरणी प्रार्थना.
आज दिव्यांग घटकांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन प्रमाणपत्र, विविध योजनांचे धनादेश अ. भा. कार्ड, राष्ट्रीय कुटुंब आपत्ती योजनेचे लाभ देतांना मनस्वी समाधान होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच जी-20 शिखर परिषद यशस्वी आयोजीत करून जागतिक महासत्तेचे अध्यक्ष जो. बायडेन यांचेबरोबर भारतासह अन्य देशातील अडचणी सोडविण्यासाठी जी सकारात्मक चर्चा करून शांततेच्या मार्गाने तोडगे काढले ती जगासाठी मोठी उपलब्धी आहे. विकसीत भारतासह युवा वर्गाचे प्रश्न आणि त्याच्या यशस्वीतेसाठी तयार केलेला कृतीशील आराखडा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश आहे त्यामुळे सर्वांना ते देशाच्या पंतप्रधानपदी तेच रहावे असेच वाटते असे त्या शेवटी म्हणाल्या.

या प्रसंगी श्री.पराग संधान, श्री.दिलीपराव दारुणकर, श्री. सत्येनजी मुंदडा, सौ. शिल्पाताई रोहमारे, श्री. रवींद्र पाठक, श्री सुनिल देवकर, श्री.कैलास जाधव, श्री. प्रकाश शेळके, श्री. कैलासराव राहाणे, श्री. विजयराव आढाव, श्री. अविनाश पाठक, श्री. दिपक जपे, श्री. राजेंद्र बागुळ, श्री.जयेश बडवे, श्री. गोपीनाथ गायकवाड, डॉ.राजकुमार दवंगे, खालिकभाई कुरेशी, फकिरमंहमद पहिलवान, श्री. सतिश रानोडे, श्री. मुकुंदमामा काले, श्री. शिवाजी खांडेकर, श्री. सतिश चव्हाण, शफिकभाई सैय्यद, श्री. स्वप्निल कडु, श्री. चंद्रकांत वाघमारे, श्री. सचिन सावंत, श्री. विक्रम पाचोरे, श्री. प्रभुदास पाखरे, श्री. संतोष साबळे, श्री. प्रसाद आढाव, श्री. दादासाहेब नाईकवाडे, श्री. किरण सुपेकर, श्री. जयप्रकाश आव्हाड, श्री. सुजल चंदनशिव, श्री. जगदीश मोरे, श्री. हरिभाऊ लोहकणे, श्री. शंकर बिर्हाडे, हुसेनभाई सैय्यद, हाशमभाई पटेल, श्री. संतोष नेरे, श्री. अर्जुन मोरे, सलिमभाई शेख, श्री. अंबादास चंदनशिव, अल्तमस पठाण, श्री. सोमनाथ ताकवले, रहीमभाई शेख श्री. शामराव आहेर, श्री. विक्की गंगुले, श्री. हर्षल लचुरे, श्री. आण्णा खरोटे, श्री. स्वप्निल मंजुळ, श्री. रवींद्र रोहमारे, श्री. रुपेश सिनगर, श्री. दिपक पंजाबी, अहमदभाई बेकरीवाले, श्री. सुभाषराव शिंदे, श्री. विजयकुमार बंब, श्री. अनिल गायकवाड, श्री. अशोक नाईकुडे, श्री. राहुल यशवंत, श्री. राहुल वाघ, श्री. शिवा सलगर, श्री. शेखर बोरावके, श्री. शुभम अमृतकर, श्री. योगेश पगारे, श्री. मयूर फुकटे, श्री. अनिल मराठे, श्री. सोनू सूर्यवंशी, श्री. शुभम घोडेराव, श्री. वाल्मीक मरसाळे,श्री. गणेश टेकाळे, श्री. अभिजीत जगधने, श्री. गणेश जाधव, श्री. राहुल घोडेराव, श्री. कृष्णा पवार, श्री. सनी पवार, श्री. प्रतीक मोरे यांच्यासह संजीवनी उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, पक्षाचे सर्व प्रमुख, कार्यकर्ते, युवक उपस्थित होते. शेवटी जयेश बडवे यांनी आभार मानले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपणासह सेवादिनाचे उपक्रम साजरे करण्यात आले.
