कायद्याच्या पालनात जबाबदारीने केलेल्या कामाचा अभिमान बाळगावा:- जिल्हा न्यायाधीश भुजंगराव पाटील…

Uncategorized

कोपरगाव तालुक्यातील कायदे विषयक शिबीराचा समारोप….
कोपरगाव प्रतिनिधी:- अनावधानाने कोणी कायद्याची चौकट मोडून वेगळे काही करत असेल तर त्याला त्याची जाणीव करुन देत कायद्याच्या पालनात जबाबदारीने केलेल्या कामाचा अभिमान बाळगावा.असे जिल्हा न्यायाधीश भुजंगराव पाटील यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
कोपरगाव तालुका विधी सेवा समिती, कोपरगाव, वकील संघ कोपरगाव यांचे वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सुचनेनुसार अखिल भारतीय विधी जागृती आणि प्रचार अभियानाचा सांगता समारोह कोपरगाव गावठाणातील अहिर सुवर्णकार मंगल कार्यालयात करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश भुजंगराव पाटील होते.तर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अशोक वहाडणे, वकील संघाचे अध्यक्ष शिवाजीराव खामकर, ज्येष्ठ नागरिक उमाकांत बाविस्कर,उद्धवराव विसपुते, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे उपस्थित होते.


जिल्हा न्यायाधीश श्री.पाटील पुढे म्हणाले,कायदा फार वेगळा नसून माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे शिकवतो.व्यवसायात निटनेटके पण आणतांना व्यवहारात कागदोपत्री नेटकेपणा असायला हवा.आस्थापनेत सी.सी.टी.व्ही.असणे आवश्यक असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले,लहान मुलांना वाहने चालविण्यासाठी देण्याचे टाळावे.सोशलमिडियातील वापर काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित म्हणाले, सर्वसामान्यांना कायदे विषयक प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे.कायद्याचे ज्ञान असेल तर आपण सुजाण नागरिक बनू शकतो.बदलत्या काळात तरुणांनी बदलणे आवश्यक आहे.कायद्याचे पालन करणारा नागरिक तयार करावयाचा आहे.असे सांगत श्री.पंडित पुढे म्हणाले,फसवणुकीचे प्रकार टाळून व्यापा-याने पुढच्या पिढीत विश्वासार्हता निर्माण करण्याचे आवाहन केले.
अतिरिक्त सहाय्यक अभियोक्ता अशोक वहाडणे,मनोहर येवले, वकील संघाचे अध्यक्ष शिवाजीराव खामकर,प्रा.डाॅ.व्ही.पी.सुपेकर, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले,विधीज्ञ वैभव बागुल यांनी कायदे विषयक शिबार आणि कायदे विषयक अनुभव विषद केले.
प्रारंभी सरस्वती प्रतिमा पुजन आणि दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांनी केले.स्वागतगीत शारदा संगीतचे प्रियंका लावर,वैभवी गोरे यांनी सादर केले.


कार्यक्रमास आत्मा मालिक एन.डी.ए.अकादमीचे मयुर धोकचौळे, मिलिटरी प्रशिक्षण प्रमुख साईनाथ वर्पे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बबन वाघमोडे, आदर्श ग्रामसेवक महेश काळे,ॲड.महेश भिडे,ॲड.संजय मंडलिक,ॲड.शितल देशमुख ,ॲड.वाबळे,ॲड.कडू,ॲड.बलमे,ॲड.भोंगळे,ॲड.एस.जी.गरुड, मुंबादेवीचे सुनील फंड,मनोज कपोते,भाऊसाहेब बागुल, कृष्णा उदावंत, तुळशीदास बागुल, रामदास बागुल, पंडित यादव,अशोक दुसाने,योगेश बागुल, विकास आढाव,संतोष देवळालीकर,सौ.कावेरी कपोते,न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष बंडू बडे,सागर नगरकर,सुरज माळवदे, राहुल बेडके,सागर गुरसळे यांचे सह मुंबादेवी,प्रगत शिवाजी रोड,छत्रपती शिवाजी रोड व्यापारी कोपरगाव सराफ सुवर्णकार असोसिएशन यांचे सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक सहाय्यक अभियोक्ता अशोक टुपके तर सुत्रसंचलन सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले.आत्मा मालिक मिलिटरी स्कूल व एन.डी.ए.अॅकेडमीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी कोपरगाव शहरातून मनोधैर्य प्रचार फेरीचे सवाद्य आयोजन केले होते.आभार सोमेश्वर महादेव देवस्थानचे व्यवस्थापक जयंत विसपुते यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *