राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच मतदार संघाच्या विकासाला बळकटी:- ना.आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांनी मतदार संघाच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत केल्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळेच मतदार संघाच्या विकासाला बळकटी मिळाली असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्याशी चर्चा करतांना सांगितले.
माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले असता ना. आशुतोष काळे यांनी त्यांचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांनी ना.आशुतोष काळे यांच्याशी मतदार संघात सुरु असलेल्या विविध विकास कामांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. मागील अडीच वर्षात मतदार संघातील विकासाचा अनुशेष भरून काढून ना. आशुतोष काळेंनी मतदार संघात केलेल्या हजारो कोटींच्या विकास कामांचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांनी यावेळी कौतूक केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे अनमोल मार्गदर्शन व माजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तसेच महाविकास आघाडी सरकारच्या सर्व मंत्र्यांनी केलेल्या सहकार्यातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मतदार संघातील विकास कामे मार्गी लावण्यात यश मिळाले आहे. मतदार संघाच्या विकासाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळेच खऱ्या अर्थाने बळकटी मिळाली असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांना यावेळी सांगितले. यावेळी माजी ऊर्जा राज्यमंत्री आ. प्राजक्तदादा तनपुरे, श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीपजी वर्पे उपस्थित होते.

फोटो ओळ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करतांना ना. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *