
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणारी समता नागरी सहकारी पतसंस्थेने ३७ व्या वर्षात पदार्पण केले असून समताच्या ठेवीदारांच्या ठेवी समताच्या अभेद्य सुरक्षा कवचामुळे अधिक सुरक्षित झाल्या असून भविष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद समतात आहे तसेच कोरोना काळातील सभासद,ठेवीदार,कर्जदार यांना पुरविलेल्या सुविधा आणि त्यांची केलेली सेवा ही कौतुकास पात्र आहे.असे गौरवोद्गार अकोला जिल्ह्यातील निशांत मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष व अकोला विदर्भ चे आमदार श्री रणधीर सावरकर यांनी काढले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त समता इंटरनॅशनल स्कूल येथे समता ग्राहक कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी ते बोलत होते.
तसेच ते पुढे म्हणाले की,काका कोयटे राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष म्हणून सहकारात उल्लेखनीय काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रात ही श्री संदीप कोयटे व सौ स्वाती कोयटे यांच्यासारख्या कुशल नेतृत्वाच्या आधारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवत्तापूर्ण शिक्षण देत एक सामाजिक दायित्वाची भूमिका पार पाडत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी भूषविले.प्रमुख पाहुणे अकोला जिल्ह्यातील निशांत मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष व अकोला विदर्भचे आमदार श्री रणधीर सावरकर यांचे स्वागत समता पतसंस्थेचे सर्व संचालक यांनी संयुक्तिकपणे केले तर त्यांचा सत्कार समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन संस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे यांनी केले तसेच त्यांनी समता लिक्विडीटी बेस्ड प्रोटेक्शन फंड अंतर्गत समताच्या अभेद्य सुरक्षा कवचाचे चित्रफितीच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.समताच्या सोहळ्याला ६ हजाराच्यावर सभासद,ठेवीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रास्ताविक करताना म्हणाले की,आपल्या सारख्या सभासद,ठेवीदारांच्या विश्वासामुळे समताने आज ३७ व्या वर्षात पदार्पण केले असून सोनेतारणासारख्या सुरक्षित कर्ज प्रकारचा अवलंब करत लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंड अंतर्गत समताच्या ८०७९४ ठेवीदारांच्या ९९.३५℅ ठेवीदारांच्या प्रत्येकी १५ लाख रुपायापर्यंतच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहे.उर्वरित ठेवीदारांच्या ठेवी अति सुरक्षित कर्ज प्रकारामुळे त्या ही अति सुरक्षित आहे. या पुढे ही महाराष्ट्रातील समताच्या सर्वच ठेवीदारांच्या ठेवींना अधिक अभेद्य सुरक्षा कवच प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे समताच्या सभासद,ठेवीदारांचे संस्थेत येणे-जाणे,भेटी-गाठी होत नसल्याने समताच्या ३७ व्या वर्धापन दिनी समताचे सभासद,ठेवीदारांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करून त्यांना या निमित्ताने चला हवा येऊ द्या मालिकेतील कलाकार भाऊ कदम,श्रेया बुगडे,स्नेहल शिदम व अंकुर गाढवे यांच्या हास्य नाटिकांची मेजवानी ही देण्यात आली.
कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील निशांत मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष व अकोला विदर्भ चे आमदार श्री रणधीर सावरकर प्रमुख पाहुणे तर प्रेरणा पतसंस्थेचे श्री सुरेश वाबळे,साई आदर्श मल्टीस्टेटचे श्री शिवाजी कपाळे,मंगलनाथ मल्टीस्टेटचे श्री रवींद्र कानडे,तुळजाभवानी मल्टीस्टेटचे श्री चंद्रकांत शेजुळ,महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे श्रीकांत साखरे,तुळजाई अर्बन मल्टीस्टेटचे राकेश न्याती,समता रुरल मल्टीस्टेटचे श्री विठ्ठल अभंग,राघवेश्वर पतसंस्थेचे गोपीनाथ निळकंठ,सुरज पतसंस्थेचे अशोक कोठारी,मंदावी पतसंस्थेचे आशुतोष पटवर्धन,कोपरगावचे तहसीलदार श्री विजय बोरुडे,पोलिस निरीक्षक श्री वासुदेव देसले,सहायक निबंधक श्री एन.जी ठोंबळ,बिडीओ श्री सचिन सूर्यवंशी,गटशिक्षणाधिकारी सौ शबाना शेख,समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती.समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री गुलाबचंद अग्रवाल,सौ अरविंद पटेल,श्री जितूभाई शहा,श्री चांगदेव शिरोडे,श्री गुलशन होडे,निरव रावलिया,श्री कचरू मोकळ,श्री अशोक दरक,मुख्य कार्यालयाचे अधिकारी,शाखाधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड यांनी मानले.
