इतिहासाने तुमची नोंद घ्यावी असे जगा पण:- प्रा.गणेश शिंदे ; सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- वडिलांकडून तुमची ओळख होण्यापेक्षा तुमच्यातून वडिलांची ओळख झाली पाहिजे. वाईट मार्गाने कमावलेली पैसे प्रेतावरची फुले असून आयुष्यात प्रामाणिक काम करतांना इतिहासाने तुमची नोंद घ्यावी असे जगण्याचा मौलिक सल्ला प्रा.गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक […]

Read More

कोपरगावात तयारी भूमी पूजनाची…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरात होणारे उपजिल्हा रुग्णालय व कोपरगाव बस आगारात होणाऱ्या व्यापारी संकुलाच्या भूमी पूजनाची तयारी सुरु असून त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच कार्यकर्ते शासकीय अधिकारी व सबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्या समवेत पाहणी करून अडचणी जाणून घेत अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या.मतदार संघातील लोकसंख्येचा विचार करता रुग्णांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी […]

Read More

के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित राजभाषा मराठी गौरव दिन…

कोपरगाव प्रतिनिधी:-जेव्हा जात आणि धर्म टोकदार होतात तेव्हा तुमच्या जगण्याचे प्रश्न बोथट होतात आजचे सामाजिक वातावरण अत्यंत विषम आणि बिघडलेले आहे. अशा प्रदूषित वातावरणात जातीपातीचे विचार बदलून सामाजिक समभाव टिकवण्यासाठी मराठी साहित्याचे वाचन आणि चिंतन अधिक गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध युवा कवी प्रा. संदीप जगताप यांनी येथे केले. स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रमण यांनी केलेल्या रामन प्रभावाचा शोध साजरा करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणुन साजरा केला जातो. महाविद्यालयांमध्ये विज्ञान दिवस साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि सर्वसामान्यांना वैज्ञानिकांच्या […]

Read More

त्यांनी आता काही पंचवार्षिक आराम करावा हि जनतेची इच्छा:- अर्जुनराव काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चाळीस वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना ज्यांना विकास करता आला नाही. लाटेवर निवडून येवून ३० हजाराचे मताधिक्य ज्यांना टिकविता आले नाही त्यांनी आता काही पंचवार्षिक आराम करावा अशी बोचरी टीका पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे यांनी कोल्हे यांचे नाव न घेता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.कोल्हेंनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या […]

Read More

संतती हीच खरी संपत्ती:- श्रीमती निलिमाताई पवार ; संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी :- ‘मुलं मोठ्यांचे अनुकरण करतात, तेव्हा पालकांनी स्वतः सभ्य कुटूंबाची आचार संहिता पाळावी, मुलांसमोर व्यसने करू नये, ते मागतील त्या वस्तु गरज असेल तरच द्या, नाही म्हणायला शिका , मुलांना पैशाचे मोल कळू द्या, त्यांना बाजार करायला शिकवा म्हणजे त्यांना व्यवहार कळेल. हे सर्व काही केले तर ते उद्याचे चांगले नागरिक बनतिल, पालकांचे […]

Read More

विखेंच्या अन्यायी सत्तेला सुरुंग लावण्यासाठी जनतेचे नेतृत्व करायला मी क्षणभरही मागे हटणार नाही:- विवेकभैय्या कोल्हे…

विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चा…कोपरगाव प्रतिनिधी: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास कामे मंजूर करताना दुजाभाव करत असून, राजकीय द्वेषभावनेतून त्यांनी ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी जाणीवपूर्वक अडवला आहे. त्यांनी हजारो दलित, आदिवासी समाजबांधवांसह गोरगरीब जनतेला शासकीय विकास निधीपासून वंचित ठेवले आहे. […]

Read More

डॉ. मयुर तीरमेखेंनी कोपरगावचा नाव-लौकिक वाढविला -आ.आशुतोष काळे ; आशुतोष काळे कलाकरांच्या कलेची कदर करणारे आमदार:- अभिनेता सिद्धार्थ जाधव…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगावात उच्च दर्जाचे कलाकार आहेत त्याचबरोबर डॉ. मयूर तीरमेखेंनी अभिनयाबरोबरच चित्रपट निर्मितीमध्ये देखील पाऊल ठेवले हि संपूर्ण कोपरगावकरांसाठी अभिमानास्पद बाब असून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत कोपरगावचा नावलौकिक वाढविला असल्याचे गौरवोदगार आ. आशुतोष काळे यांनी काढले आहे. कोपरगाव शहरातील प्रसिद्ध डॉ. मयूर तीरमखे यांनी निर्मिती केलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सिध्दार्थ जाधव व […]

Read More

पश्चिमेचे-पाणी पुर्वेकडे वळविण्यासाठीपुढाकार घेऊन नगर-नासिकचा वाद कायमचा संपुष्टात आणावा पाणी प्रश्नावर आ.आशुतोष काळेंची विधानसभेत मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नगर नाशिकमध्ये बहुतांशी धरणे बांधून शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. ज्यावेळी धरणांची निर्मिती झाली त्यावेळी सिंचनासाठी बारमाही पाणी मिळत होते. मात्र जसजसे नागरीकरण वाढलं व लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढले जावून शेती सिंचनाचे पाणी कमी झाल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत नगर, नाशिक आणि मराठवाड्याचा पाण्यावरून वाद निर्माण होत आहे. त्यामुळे पश्चिमेकडचे […]

Read More

गौतमचा एनसीसी, स्काऊट व गाईड संयुक्त कॅम्प उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलचे एन.सी.सी., स्काऊट व गाईड यांचा संयुक्त कॅम्प दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र राघवेश्वर मंदिर कुंभारी येथे उत्साहात पार पडला. शाळेचे इयत्ता नववीतील एन.सी.सी., स्काऊट व गाईडचे एकूण १५० विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. कॅम्पची सुरुवात राघवेश्वराचे दर्शन घेऊन व […]

Read More