कोळ नदीवरील बंधारा भरला, नागरीकांनी जलपूजन करून मानले आ.आशुतोष काळेंचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गोधेगाव-घोयेगाव, धोत्रा, आपेगाव, तळेगाव आदी गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेला गोधेगाव-घोयेगावच्या कोळ नदीवरील बंधारा गोदावरी डाव्या कालव्याच्या माध्यमातून भरला असून त्याबद्दल लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी व नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानून बंधाऱ्याच्या पाण्याचे विधिवत पूजन केले आहे.चालू वर्षीच्या तीव्र उन्हामुळे भू-गर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. कोपरगाव तालुक्याच्या […]

Read More

कृषीचे उत्पादन व उत्पन्न वाढीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा वाटा असणार:- आमदार श्री. राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कृषीचे उत्पादन वाढीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा सहभाग असणार आहे. राहुरी कृषी विद्यापीठाने कृषीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, रोबोटिक्स यावर मोठे काम केले आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर व व्यापारी तत्त्वावर शेतकऱ्यांच्या शेतावर होणे आवश्यक आहे. भविष्यामध्ये कृषीचे उत्पादन व उत्पन्न वाढीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा वाटा असणार असल्याचे प्रतिपादन आमदार श्री.राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील […]

Read More

शिवसेनेकडून महिलांना समाजकारण व राजकारणात मोठी संधी:- विमल पुंडे…

कोपरगाव प्रतिनिधी: महाराष्ट्रात आणि देशातही महायुतीचे शासन सर्व आघाड्यावर उत्तम काम करत आहे. महायुतीचे शासन काळात संरक्षण, अर्थ, व्यापार, शिक्षण, कृषी ,विज्ञान आदी सर्व क्षेत्रात आपण विकास साधत आहोत.आपली अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे.संरक्षण क्षेत्रात आपण घेतलेल्या आघाडीचा प्रत्यय आपण नुकताच जगाला दाखवून दिला आहे. आपलं महाराष्ट्र राज्य देशात आता पुन्हा […]

Read More

कोपरगाव बस आगारास १५ नवीन एस.टी. बस लवकरच होणार उपलब्ध मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या मा. आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव एस.टी. आगारात बस संख्या कमी असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे (MSRTC) नवीन बस (बी एस ६) मागवण्यासाठी निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन परिवहन मंत्री यांच्या निर्देशानुसार आणि संबंधित कार्यालयाच्या कार्यवाहीनंतर कोपरगाव आगाराला १५ नवीन प्रकारच्या बसेस टप्प्या […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना शेतकी विभागाच्या तीस अधिकारी कर्मचा-यांनी बारामतीत एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उस उत्पादनांत हमखास वाढ याबाबतचे घेतले प्रशिक्षण….

कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कमी खर्चात शेतक-यांचे अधिक उस उत्पादन वाढावे याबाबत सातत्याने जनजागृती केली, त्याच पावलावर पाउल ठेवत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी सभासद शेतक-यांचे उस उत्पादन वाढीसाठी कार्यक्षेत्रात धडक कार्यक्रम हाती घेवुन त्याबाबत शास्त्रोक्त माहिती देत आहेत, यात आणखी अचुकता यावी म्हणून […]

Read More

काकडीत कोल्हे गटाला मोठा धक्काकाकडीच्या सरपंच सौ.पूर्वा गुंजाळ व कानिफनाथ गुंजाळ काळे गटात…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव तालुक्यातील काकडी गावच्या सरपंच सौ.पूर्वा गुंजाळ व कोल्हे गटाचे कट्टर कार्यकर्ते कानिफनाथ गुंजाळ यांनी नुकताच ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांसह काळे गटात प्रवेश केला आहे. आ.आशुतोष काळे यांनी सरपंच सरपंच सौ.पूर्वा गुंजाळ, कानिफनाथ गुंजाळ,त्यांच्या सहकारी सदस्यांचे व कार्यकर्त्यांचे काळे गटात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.काकडी गावच्या सरपंचपदाची जबाबदारी सांभाळत असतांना काकडी […]

Read More

कोपरगावमध्ये भव्य तिरंगा मशाल रॅली संपन्न, देशभक्त नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग…

देशभक्त कोपरगावकरांच्या तिरंगा रॅलीमध्ये ब्रह्मोस आणि S400 ठरले प्रेरणेचे स्रोत…कोपरगाव प्रतिनिधी:-भारत मातेच्या वीर सैनिकांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने कोपरगाव शहरात भव्य तिरंगा मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. समस्त देशभक्त कोपरगांवकरांच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमात युवा प्रतिष्ठानचे संस्थापक युवानेते मा. विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा सेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला […]

Read More

प्रधानमंत्री आवास योजनेच्या नाव नोंदनीला मुदतवाढ लाभ घेवू न शकलेल्या नागरिकांनी लाभ घ्यावा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- देशातील प्रत्येक व्यक्तीला पक्के घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि.१५ मे होती. परंतु गरजू नागरीक या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी दि.३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती […]

Read More

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीव शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठीकोपरगांवकरांच्या वतीने भव्य तिरंगा महारॅली संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – पहलगाम येथे झालेल्या हल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबविण्यात आली. या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीमेत शौर्याचे दर्शन घडवून पाकिस्तानला वठणीवर आणणाऱ्या शूर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ व या मोहिमेत शहीद झालेल्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोपरगाव शहरात कोपरगावकरांच्या वतीने तिरंगा महारॅली काढण्यात आली.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी या महारॅलीमध्ये सहभागी होत देशाचा […]

Read More

निळवंडे धरणाचे पाणी रांजणगाव देशमुख परीसरात शेतकऱ्यांना दिलासा आ. आशुतोष काळेंचे मानले आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती गावाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे पाणी नियमितपणे जिरायती गावांमध्ये पोहोचत असून ज्या ज्यावेळी निळवंडेचे आवर्तन सुरु होते त्या त्यावेळी आ. आशुतोष काळे स्वत: लक्ष घालून हे पाणी सर्वच लाभधारक क्षेत्रातील गावांमध्ये पोहचवत आहे. याहीवेळी सुरु असलेल्या आवर्तनातून तळेगाव ब्रांचमधून रांजणगाव देशमुख व परीसरातील जिरायती गावांमध्ये निळवंडेचे पाणी […]

Read More