दुष्काळी भागाला जलमय करण्यासाठी ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रा महत्वपूर्ण पाऊल ठरणार :- जलसंपदामंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. ;‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे कोपरगावात जल्लोषात स्वागत…

Uncategorized

‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रा दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर- महायुती शासनाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा या उद्देशातून पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी ३०० वर्षांपूर्वी जी जल क्रांती केली आज तीच जल क्रांती करण्याची गरज असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दुष्काळी भागाला जलमय करण्यासाठी ही ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रा महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगाव येथे केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.श्रीम.सुनेत्राताई पवार व उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रेचे सोमवार (दि.२७) रोजी कोपरगाव नगरीत आगमन झाले यावेळी श्री साईबाबा तपोभूमी येथे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पवित्र जल कलशावर फुलांची उधळण करून कलशाचे विधिवत पूजन केले. शिर्डी कडून येणाऱ्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे कोपरगाव शहरामध्ये ढोल ताश्यांच्या गजरात, फटाक्यांच्या अतिशबाजीत आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी रस्त्यांवर ठिकठिकाणी ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यावेळी या ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रेसोबत जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रामराम वडकुते, आ. गोपीचंद पडळकर, आ.सदाभाऊ खोत आदी मान्यवर होते.


यावेळी बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, अत्यंत कुशल, दूरदर्शी आणि प्रजाहितदक्ष शासक अशी ओळख असणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या काळात जलव्यवस्थापनाला विशेष प्राधान्य दिले होते. त्यांच्या जलसंधारण कार्याचा वारसा पुढे घेवून जाण्यासाठी व महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रेच्या माध्यमातून जलसंधारणाचे महत्त्व पटवून देणे आणि लोकसहभागातून शाश्वत जलव्यवस्थापनाची चळवळ उभी करण्यासाठी टाकलेले ठोस पाऊल असून ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रा दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी हे उद्याचे भविष्य असून राज्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ३०० वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे जलसंधारण आणि जल व्यवस्थापनाच्या बाबतीत पाण्याचा थेंब अन् थेंब जपून वापरण्याचा संदेश दिला, जो आजही अनुकरणीय आहे. तोच वारसा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा’ जल यात्रेच्या माध्यमातून पुढे घेवून जात असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
आ.गोपीचंद पडळकर म्हणाले की, महाराष्ट्रातून पहिल्यांदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी चौंडी ते कर्मभूमी महेश्वर जल यात्रेचे आयोजन राज्याच्या जलसंपदा विभागाच्या माध्यामातून करण्यात आले आहे. हि फक्त जलयात्रा नाही तर महाराष्ट्राच्या दुष्काळ मुक्तीचा संकल्प आहे. ज्या भागात दुष्काळ आहे त्या भागाला शाश्वत पाणी देण्यासाठी महायुती शासन आटोकाट प्रयत्न करीत असून लवकरच महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी समता पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष काका कोयटे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, माजी व्हा.चेअरमन पद्माकांत कुदळे, काकासाहेब जावळे, तसेच कारखाना व उद्योग समुहाचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक, पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, गोदाकाठच्या गावातील ग्रामस्थ, आजी माजीनगरसेवक, जलसंपदा विभागाचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *