सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यामुळे इंद्रियांना बल प्राप्त होते:- शिवाजी महाराज …

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
वयाच्या पन्नाशी नंतर शरीराच्या अवयवात क्षीणपणा यायला सुरुवात होते. दर दहा वर्षांनी वाढ दिवस साजरा केला पाहिजे.तसेच शास्त्रानुसार इंद्रियांना बल प्राप्त होण्यासाठी ८२ वर्षानंतर सहस्र चंद्रदर्शन सोहळा केला पाहिजे असे प्रतिपादन ह भ प शिवाजी महाराज भालुरकर यांनी केले आहे.
तालुक्यातील कान्हेगाव येथे कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, डी वाय एस पी संजय सांगळे व माजी सरपंच राजेंद्र सांगळे यांच्या मातोश्री शशिकला चांगदेव सांगळे यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
वृद्धापकाळात जगण्यासाठी माणसांना अन्न,वस्त्र,पैसा यांच्या पेक्षा कुटुंबाच्या आपुलकीची व प्रेमाची गरज असते.शरीरातील इंद्रियांची शक्ती कमी झाल्यानंतर मंत्रोच्चारामुळे बल प्राप्त होते.इंद्रिये दृढ बनतात. अंतकरणामधे नवीन उर्जा निर्माण होते.ही ऊर्जा पुढील काळात उपयोगी पडते.
ज्या व्यक्तीने जन्म झाल्यापासून पौर्णिमेचे एक हजार चंद्र बघितले म्हणजेच सहस्रचंद्र दर्शन झाले असे म्हणतात.यावेळी एक हजार कनकीच्या दिव्यांनी औक्षण केले जाते असेही पुढे बोलतांना सांगितले.ही प्रक्रिया शास्त्रोक्त मंत्रोच्चारात केल्याने अवयवात आलेला क्षीणपणा नष्ट होतो तसेच अभिष्टचिंतन आणि सहस्रचंद्र दर्शन ह्या दोन्ही प्रकिया वेगवेगळ्या
आहेत.असेही सांगितले.
सदर प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांनी दीर्घायुषी शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्या सुना , नातवंडे,नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *